शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार साळवी यांची हकालपट्टी करण्याचे धाडस दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या ...

राजापूर : ज्यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले होते, त्यांची यापूर्वीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे पक्षातून हाकलून दिलेल्या मंडळींना पक्षात घेऊन भाजप आपली पाठ थोपटून घेत आहे, असे वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या सागवे विभागातील पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. काबाडकष्ट करून तळागाळात पक्षसंघटना वाढविणाऱ्यांनी रिफायनरीचे समर्थन केले म्हणून हकालपट्टी केली; मग रिफायनरी प्रकल्पाचे जाहीर समर्थन करणाऱ्या शिवसेना आमदार राजन साळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला आहे. हिंमत असेल तर शिवसेनेने आमदार साळवी यांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही गुरव यांनी दिले आहे.

सागवेच नाही तर तालुक्याच्या अनेक भागांतील शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक शिवसेनेच्या विकासविरोधी राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यामुळेच शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पायांखालची जमीन आता सरकू लागल्याचा टोला गुरव यांनी लगावला आहे. राजापूर तालुक्यात भाजपने शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. सागवे विभागातील रिफायनरी प्रकल्पसमर्थक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला असतानाच शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करीत शिवसेनेला दणका दिला.

जे भाजपमध्ये गेले त्यांची दोन वर्षांपूर्वी पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यांना पक्षात घेऊन ढोल बडविणे म्हणजे भाजपचा वैचारिक दळभद्रीपणा असल्याची टीका सागवेतील शिवसेना पदाधिकाऱ्याने केली आहे. याचा समाचार गुरव यांनी घेतला आहे. जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती, तर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून, त्यांचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा घेऊन फेरनिवडणूक घेण्याचे धाडस शिवसेनेने का दाखविले नाही? असा प्रश्न गुरव यांनी केला आहे. ज्यांनी निष्ठेने पक्षात काम केले, पदरमोड करून पक्ष वाढविला, तळागाळात संघटना वाढविली, त्यांनी विकासासाठी प्रकल्पाचे समर्थन केले म्हणून त्यांची हकालपट्टी करता आणि मग मुंबईत टीव्ही चॅनेलसमोर रिफायनरी प्रकल्पाचे स्वागत करून जाहीर समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवींची का नाही हकालपट्टी केली? असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वेगळा न्याय आणि नेत्यांना वेगळा न्याय असे शिवसेनेने आहे काय? असाही टोला गुरव यांनी लगावला आहे. भविष्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही गुरव यांनी केला आहे.