शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेची खेळी, स्थानिक भाजपला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या साऱ्यातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.

मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेगळाच होता. सकाळी सात, साडेसात वाजल्यापासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठच कोणत्याही क्षणी राणे यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली. त्यामुळे वातावरण एक प्रकारचा तणाव आला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र तयार होऊ लागले. हे शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे चित्र होते. त्यामुळे काहीतरी घडणार, अशी शक्यता तयार झाली.

या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. एरवी शिवसेनेच्या आंदोलनाला दुसरी बाजू नसते. शिवसेनेचे आंदोलन एकतर्फी होते. मात्र यावेळी शिवसेनेच्या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची वेळ याआधी आली नव्हती. आता नारायण राणे, नीलेश राणे पाठीशी असल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेनेला उत्तर देण्यासाठी तेवढ्याच आवेशाने पुढे झाले, हा भाजपसाठी मोठा बदल आहे. ही मानसिकता भाजपच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मोठे बळ देणारी आहे.

....................

आजवर भाजप दबलेलाच

ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या बलाढ्य ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप केवळ शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.

...............

युती तुटली, भाजप खोलातच

शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप अधिकच खोलात गेली. भाजपची स्वत:ची मते कायम असली तरी ती निवडून येण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मानसिक स्थिती कायमच पराभूताची होती. शिवसेनेची साथ सुटल्यानंतर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठे यश मिळाले नाही. मात्र आता नारायण राणे भाजपमध्ये आल्याने आणि विशेषत: मंगळवारच्या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..............

थोड्याचवेळात नवे फलक

मंगळवारी सकाळच्या सत्रात शिवसेनेने आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. रत्नागिरी शहरातही त्याचे पडसाद उमटले. मारुतीमंदिर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे फलक फाडले. एरवी भाजपचे कार्यकर्ते अशा घटनेनंतर निषेध करुन शांत राहिले असते. मात्र हे फलक फाडल्यानंतर काही वेळातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवे फलक लावले. भाजप कार्यकर्त्यांची ही बदललेली मानसिकता शिवसेनेच्या आंदोलनामुळेच पुढे आली आहे.