शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

चिंताजनक, कोरोनाबाधित १५ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:33 AM

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात प्रथमच २४ तासांत १५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. त्यामुळे मृतांची संख्या ४६४ झाली आहे, तर कोरोनाबाधितांची संख्या निम्म्यावर आली असून, सोमवारी २५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण १५,८८९ कोरोनाबाधित झाले आहेत.

कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या वाढत असल्याने, चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये युवकांपासून ते वृद्धांपर्यंत व्यक्ती असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर आवाहन उभे ठाकले आहे. वर्षभराच्या कालावधीत प्रथमच १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील ४ रुग्ण, खेडमधील ६ रुग्ण, गुहागरातील ३ रुग्ण आणि चिपळूण, राजापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ११ पुरुष आणि ४ महिला कोरोना रुग्ण आहेत. रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, २.९२ टक्के आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील १४८ रुग्ण तर अँटिजन चाचणीतील १११ रुग्ण आहेत. त्यामध्ये मंडणगड तालुक्यात साेमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची संख्या शून्य आहे, तर रत्नागिरी तालुक्यात ५३ रुग्ण, दापोलीत ४३, खेडमध्ये २२, गुहागरात ४, चिपळुणात ६३, संगमेश्वरमध्ये ५४, लांजात ५ आणि राजापुरात १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण १२.१६ टक्के असून, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७६.९१ टक्के आहे.