शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

केळवलीत श्रमदानातून नदी गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लांजा तालुक्यातील केळवली हे दुर्गम गाव सुमारे साडेआठशे लोकवस्तीचे असून, अनेक वाड्या गुण्यागोविंदाने नांदत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील केळवली हे दुर्गम गाव सुमारे साडेआठशे लोकवस्तीचे असून, अनेक वाड्या गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मात्र, या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात कायमस्वरूपी पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र, मुंबईस्थित अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे या दोन ग्रामस्थांची नाळ कायमस्वरूपी गावाशी जोडलेली असल्याने त्यांच्या प्रयत्नातून आणि नाम फाऊंडेशनच्या महत्त्वपूर्ण सहकार्यातून या गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील नदी गाळमुक्त करून खऱ्या अर्थाने जलक्रांती केली आहे.

केळवली गावातील बहुतांश लोक मुंबईत नोकरीनिमित्त वास्तव्याला असून, सुटीच्या कालावधीत अधूनमधून गावाला ये-जा असते. मात्र, अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांचे सातत्याने गावी येणे होत असते. मार्च महिन्यापासून केळवलीला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे या कालावधीत अनेक मुंबईकर गावी पाठ फिरवतात. मात्र अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांचे सातत्याने गावाला येणे असल्याने पाणीटंचाईवर काहीतरी मार्ग काढायला हवा, ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांना अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनने अनेक गावांमधील नद्यांचा गाळ काढून पाणी समस्या दूर केल्याचे त्यांना माहीत होते. यातूनच या दोघांना प्रेरणा मिळाली व त्यांनी या संस्थेशी संपर्क केला. त्यात त्यांना यश आले. ‘नाम’चे मुख्य समन्वयक गणेश थोरात, कोकण विभागप्रमुख समीर जानवलकर यांच्याशी संपर्क साधून पूर्ण माहिती घेतली आणि ‘नाम’च्या सहकार्याने अरविंद चव्हाण आणि बंडू तावडे यांच्या पुढाकाराने आणि केळवलीतील सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीतून मे २०१९पासून गावच्या नदीतील गाळ उपसा कामाला प्रारंभ झाला. याचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योजक आर. डी. सामंत यांच्या हस्ते झाला.

नाम संस्थेने पोकलेन मशीन आणि त्यावर चालक दिला. डिझेलसह चालकाचे भोजन, राहण्याचा खर्च यासाठी ग्रामस्थांना ५-६ लाखांचा निधी आवश्यक होता. यावरही मात करत ग्रामस्थांच्या एकजुटीतून निधी उभा राहिला. विशेष म्हणजे युवकांबरोबरच गावातील ज्येष्ठ मंडळीही श्रमदानासाठी पुढे सरसावली. अतिशय दुर्गम भागात असूनही ग्रामस्थांनी अहाेरात्र केलेल्या परिश्रमातून गावातील नदी, नाले यांची स्वच्छता झाली. गाळ काढून रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले. ‘नाम’च्या मदतीने या गावात अन्य काही कामेही यापुढे करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमातून निधी...

डिझेलचा खर्च चालकाच्या खाण्या - पिण्याची, राहण्याची सोय यासाठी ग्रामस्थांना निधी उभा करणे क्रमप्राप्त होते. बंडू तावडे यांच्यासह मुंबईतील मंडळींनी यासाठी मुंबईला दोन मोठे कार्यक्रम आयोजित केले. यातून ग्रामस्थ, मित्रमंडळी एकत्र आले आणि निधीसाठी मदतीचे हात पुढे आले. त्यामुळेच केळवली या दुर्गम गावाची पाणी समस्या दूर झाली.

अडीच कोटी पाणीसाठा

ग्रामस्थांची एकजूट आणि पै-पैचा आर्थिक लोकसहभाग यातून हे काम पूर्ण झाले आहे. गावात नदी-नाल्याचे २.५ किमीचे काम झाले असून, अंदाजे १ कोटी १२ लाख लीटर साठा झाला आहे. गावापासून २ कि. मी. अंतरावर सह्यादीच्या पायथ्याशी केलेल्या तलावात १ कोटी ३४ लाख लीटर असे एकूण २ कोटी ४६ लाख लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

आधारस्तंभ हरपला...

मे २०१९मध्ये या मोहिमेला सुरूवात झाली. कोरोना काळ असल्याने लाॅकडाऊन सुरू होते. त्यामुळे अनेक अडथळे आले. त्यावरही केळवलीतील मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी मात केली. गावचे आधारस्तंभ असलेले मुंबई मंडळाचे अध्यक्ष शिवाजी तावडे यांचे कोरोनाने निधन झाले. या परिस्थितीतही ग्रामस्थांनी धीर न सोडता काम केले.