शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:35 AM

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा ...

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांत पावसाच्या परतीचा प्रवास विलंबाने हाेत आहे. पावसाचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू हाेताे. मात्र, राजस्थानमध्ये अद्याप परतीच्या प्रवासासाठी पाेषक स्थिती नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा परतीचा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे.

पावसाचे आगमन आणि परतीच्या वेळा ठरविण्यासाठी गेल्यावर्षीपासून हवामान विभागाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पावसाची संपूर्ण देशातील परतीची सर्वसाधारण तारीख १५ ऑक्टोबर आहे, तर हवामान विभागाने १७ सप्टेंबर ही पावसाची राजस्थानातून परतीची नवीन सर्वसाधारण तारीख निश्चित केली हाेती. यापूर्वी राजस्थानातून परतीची तारीख १ सप्टेंबर ठरविण्यात आली होती. मात्र, अद्यापही या भागात परतीच्या प्रवासासाठी पाेषक वातावरण तयार झालेले नाही.

गेल्या दहा वर्षांतील राजस्थानमधील पावसाच्या परतीची वाटचाल पाहता, २०११ मध्ये २३ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. त्यानंतर २०१२ मध्ये २४ सप्टेंबर, तर २०१४ मध्ये २३ सप्टेंबर राेजी परतीचा प्रवास सुरू झाला हाेता. २०१७ पासून सातत्याने सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेत आहे. २०१९ मध्ये आजपर्यंतच्या सर्वात उशिराने म्हणजेच ९ ऑक्टोबर रोजी परतीचा प्रवास सुरू झाला होता.

राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर भारतातील इतर भागात परतीच्या प्रवासाला सुरुवात हाेते. चालू माेसमात नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या राजस्थानातून माघारी परतण्यास अद्यापही पोषक स्थिती नाही. राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश असा परतीचा प्रवास सुरू हाेताे. त्यानंतर महाराष्ट्रातून पावसाच्या परतीला सुरुवात हाेते. मात्र, राजस्थानमधून उशिराने परतीचा प्रवास सुरू हाेणार असल्याने महाराष्ट्रातूनही पावसाचा परतीचा प्रवास उशिराने सुरू हाेणार आहे.

----------------

गेल्या दहा वर्षांतील वायव्य भारतातून परतीचा प्रवास

२०११ : २३ सप्टेंबर

२०१२ : २४ सप्टेंबर

२०१३ : ९ सप्टेंबर

२०१४ : २३ सप्टेंबर

२०१५ : ४ सप्टेंबर

२०१६ : १५ सप्टेंबर

२०१७ : २७ सप्टेंबर

२०१८ : २९ सप्टेंबर

२०१९ : ९ ऑक्टोबर

२०२० : २८ सप्टेंबर