शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:37 PM

रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.

ठळक मुद्दे दोन वर्षे प्रतीक्षा, सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचकर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात

रत्नागिरी : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी, अधिकारी हे कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असतात. अनेकदा काही कर्मचारी, अधिकारी हे फिरतीचे कारण सांगतात आणि कार्यालयीन काम सोडून वैयक्तिक कामात गुंतले असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी फिरतीवर जाणार असतील, त्यांची नोंद त्या-त्या ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करण्यात यावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला होता.आजही अनेक कर्मचारी, अधिकारी हे फिरतीवर जात असतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तशी नोंद होत नसल्याचे पुढे आले आहे.

स्थायी समितीने घेतलेल्या या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फिरतीवर जाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वचक राहणार होता. मात्र, तशी अंमलबजावणी करण्यास जिल्हा परिषदेकडूनच चालढकल करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे़फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचजिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत झालेल्या एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे़ मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी स्थायी समितीच्या सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या ठरावाची अंमलबजावणी केल्यास फिरतीवर जाणाऱ्या  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीत आपली नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवण्याचेच काम केले जाणार आहे. कर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात, म्हणूनच याच्या अंमलबजावणीला टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद