शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 5:01 AM

केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्यांची निर्यात बांगला देश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बाहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल.

नवी दिल्ली/नाशिक : दोन दिवसांपूर्वी गुजरातहून दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे संतप्त पडसाद उमटले. त्याची दखल घेत केंद्र सरकारकडून २९,१५० टन लाल कांदा सहा देशांमध्ये निर्यात करण्यास परवानगी देण्याची अधिसूचना शनिवारी जारी केली. मात्र हा निर्णय जुनाच असून आकडेवारी एकत्र करून नव्याने अधिसूचना जारी केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्याचे स्पष्टीकरण देण्याची मागणीही केली आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिलेली कांद्यांची निर्यात बांगला देश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बाहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या देशांना करण्यात येईल. केंद्राने गुजरातमधून दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यातीस परवानगी दिल्यावर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील मतदानावर व्हायला नको म्हणून सरकारने सहा देशांच्या कांदा निर्यातीस परवानगी दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पहिल्या घोषणेतील निम्म्या कांद्याचीही निर्यात झाली नाही

• शेतकयांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्राने पाच मित्रदेशांना सुमारे १९९ हजार मे. टन कांदा निर्यात करण्याची मार्चमध्ये घोषणा केली होती.मात्र, प्रत्यक्षात केवळ सहा हजार मेट्रिक • टनांचीच आतापर्यंत निर्यात झाली आहे. परंतुया देशांत तस्करीद्वारे मोठ्या प्रमाणात कांदा पोहोचत असल्याने निम्म्याच कांद्याचा पुरवठा प्रत्यक्षात झाला.त्यामुळे आता पुन्हा सहा देशामध्ये ९९ हजार टन कांद्याच्या निर्यातीस केंद्र सरकारने दिलेली परवानगी कितपत यशस्वी होते. याबाबत कांदा उत्पादकांमध्ये शंका व्यक्त होत आहे.

शेजारील देशांनी टंचाईमुळे किमान थोडा कांदा पुरवठाकरण्याची विनंती भारताकडे केली होती. त्यानुसार मागील महिन्यात सहा देशांना थोडाथोडा कांदा देण्याचे ठरले.

शेतकऱ्यांचे काय म्हणणे?

• कांदा उत्पादक संघटनेचे नेते भारत विघोळे, निवृत्ती न्याहारकर, आदींनी मात्र कांदा निर्यातीच्या निर्णयाबाबत सावध प्रतिक्रिया दिली.■ मागील वर्षभरात केंद्र सरकारने कोणत्या देशांसाठी किती कांटा निर्यातीस परवानगी दिली, याची ही एकत्रित आकडेवारी आहे, असे सांगितले.■ केंद्र सरकारने नव्याने कांदा निर्यातीला परवानगी दिली नाही. तसेच निर्यातीच्या परवानगीचे कोणतेही परिपत्रक निघालेले नाही, असे ते म्हणाले. आकडेवारी एकत्रित करून कांदा निर्यात होणार असल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.

सरसकट निर्यातबंदी उठवा

सरकारने सरसकट कांदा निर्यातबंदी उठवायला पाहिजे. ही अधिसूचना म्हणजे दर्यात खसखस आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी म्हटले आहे.

पुन्हा दिशाभूल झाली आहे का?

जुनेच आकडे दाखवून नव्याने कांदा निर्यात होणार आहे. असे भासवले जाते आहे का? असे असेल तर ही फसवणूक ठरेल, केंद्र सरकारने याबाबत तातडीने खुलासा करावा व संभ्रम दूर करावा. कांद्याची निर्यात चंदी कायमस्वरूपी उठवून शेतकऱ्याऱ्यांना दिलासा द्यावा, असे किसान सभेचे अजित नवले म्हणाले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरी