शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही न सुटणाराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:33 IST

सुनील आंब्रे लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील ...

सुनील आंब्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : लोटे औद्योगिक वसाहतीसमोर केवळ स्फोट व आगीच्या घटनांचीच समस्या नाही, तर येथील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्नही अजून निकाली निघालेला नाही. कंपन्यांनी कधी त्यांच्या आवाराबाहेर, कधी नाल्यात, तर कधी खाडीच्या पाण्यात रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले आहे. त्यामुळे जलचर सृष्टीला धक्का बसला आहेच, शिवाय शेती, बागायतीवरही त्याचा परिणाम झाला आहे. रासायनिक द्रव्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्याही अनेकदा उद्भवली आहे. पाण्याचे अनेक स्रोत नष्ट झाले आहेत.

लोटे औद्योगिक वसाहत रासायनिक उद्योगांसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. मात्र, त्यामुळे या वसाहतीच्या सुरक्षेचा प्रश्न आतापर्यंत अनेकवेळा निर्माण झाला आहे. आजवरचे स्फोट आणि अपघात हा जितका चिंतेचा विषय आहे, तेवढाच चिंतेचा विषय म्हणजे रासायनिक सांडपाणी. येथील कंपन्यांनी आपले रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया केंद्राकडेच देणे अपेक्षित आहे. तेथे या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते हानिकारक होणार नाही, इतक्या स्तरावर आणणे अपेक्षित आहे. कंपनीकडून दिले जाणारे सांडपाणी कसे असावे, त्यात काय घटक असावेत, काय असू नयेत, याबाबत निकष आहेत. मात्र, निकष बाजूला ठेवून काही कंपन्या सांडपाणी थेट सोडून देतात.

आतापर्यंत सांडपाण्यामुळे नदी, नाले, खाडीतील मासे इतर जलचर, जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पाण्यामुळे शेती, फळबागांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी भातशेती पूर्ण संपूनच गेली आहे. रासायनिक सांडपाण्याचा खूप मोठा उपद्रव म्हणजे पाण्याचे स्रोत खराब किंवा नष्ट होणे. हा प्रकार परिसरात अनेक ठिकाणी झाला आहे. त्याबाबत अनेकदा ओरडही करण्यात आली आहे. मात्र, संबंधित यंत्रणांनी त्याची फार गांभीर्याने दखल घेतलेली नाही. रासायनिक सांडपाणी नाल्यात जाणे किंवा सोडले जाणे, एमआयडीसीचे चेंबर ओव्हर फ्लो होणे, सीईटीपीमधून सांडपाणी थेट खाडीत जाणे हे प्रकार केवळ पावसाळ्यातच नाही तर वर्षभरात कधीही होतात.

रासायनिक सांडपाण्याप्रमाणेच वायूगळती हाही लोटे परिसराला मिळालेला एक शाप आहे. वायूगळतीमुळे कामगार दगावल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्याचबरोबर नजीकच्या वस्तीला त्याचा त्रास होण्याचा प्रकारही अनेकदा झाला आहे. सुप्रिया लाईफसायन्सेस, एक्सेल इंडस्ट्रीज, युएसव्ही, कन्साई नेरोलॅक, रिव्हरसाईड, गोदरेज ॲग्रोव्हॅट, रॅलिज इंडिया, दीपक नोव्हाकेम, उर्ध्वा केमिकल्स या व अन्य काही कंपन्यांमधून वायूगळतीचे अपघात घडले आहेत.

२००२मध्ये घरडा केमिकल्सच्या वायूगळतीमुळे आवाशी येथील प्राथमिक शाळेतील ४५ मुलांना बाधा झाली होती. मोरॅक्स ही कंपनी वायूगळतीने आग लागून पूर्णपणे बेचिराख झाली होती.

सातत्याने होणाऱ्या वायूगळतीमुळे येथील रहिवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. कर्करोग, दमा, टी.बी. यासारखे आजार या भागात वाढत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. स्फोट आणि आगीइतकेच गंभीर परिणाम वायूगळती आणि रासायनिक सांडपाण्यामुळे झाले आहेत.