शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई व्यावसायिकांना बैठकीत दिल्या दक्षतेच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : सणासुदीच्या काळात मिठाई विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी मिठाई व्यावसायिक आणि ...

रत्नागिरी : सणासुदीच्या काळात मिठाई विक्रेत्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी मिठाई व्यावसायिक आणि उत्पादक यांच्यासमवेत नुकतीच बैठक घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या कक्षात झालेल्या या बैठकीला वाघमारे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विनीत चाैधरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित असलेल्या मिठाई व्यावसायिक आणि उत्पादकांना गणेशोत्सव काळात मिठाईबाबत घ्यावयाची काळजी याबाबत लेखी पत्रके देण्यात आली. ही पत्रके व्हाॅटसॲपच्या विविध ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन यावेळी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना व मिठाई व्यावसायिकांना करण्यात आले. आस्थापनेचा परिसर पर्यावरणीयरित्या स्वच्छ व किटकांपासून सुरक्षित असावा, पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, तयार खाद्यपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावेत, आजारी व्यक्तीने अन्न हाताळू नये, मिठाई तयार करताना फुडग्रेड खाद्यरंगाचा अत्यल्प (१०० पीपीएमपेक्षा कमी) वापर करावा, मिठाईच्या दर्शनी भागावर वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, बंगाली मिठाई २४ तासांच्या आत खाण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, मिठाई बनवणाऱ्या व हाताळणाऱ्या व्यक्तींनी नेहमी टोपी, मास्क, हातमोजे व स्वच्छ ॲप्रन वापरावा, मिठाईवर वापरला जाणारा साेनेरी व चांदीचा वर्ख उच्च दर्जाचा असावा, पदार्थ हाताळताना हात वारंवार स्वच्छ धुवावेत, कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही मिठाई विक्रेत्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीला शहरातील प्रमुख मिठाई व्यावसायिक व उत्पादक उपस्थित होते.

मिठाई उत्पादक - विक्रेत्यांनी कायद्यांतर्गत तरतुदींचे काटेकाेरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच मिठाईच्या दर्जाबाबत कुठलीही तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या ८०५५४३६१८८ किंवा १८००-२२२३८५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांनी केले आहे.

.............

फोटो मजकूर

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्यामार्फत रत्नागिरी शहरातील मुख्य मिठाई व्यावसायिक व उत्पादक यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्यात आली.