शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

खार जमिनीतील भातलागवड पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:34 IST

पाऊस सुरू झाल्यावर बी फेकून पेरावे आणि मातीचा थर थोडासा हलवावा. सरी पाडून पेरल्यास रुजवा कमी येतो. बी ...

पाऊस सुरू झाल्यावर बी फेकून पेरावे आणि मातीचा थर थोडासा हलवावा. सरी पाडून पेरल्यास रुजवा कमी येतो. बी उगवल्यानंतर त्यास ८ ते १० दिवसांनी प्रतिगुंठ्यावर एक ते दीड किलो युरिया खत द्यावे. खर जमिनीत क्षारांचा निचरा होण्याच्या दृष्टीने भात लागवडीपूर्वी चिखलणी सुरू करू नये. चिखलणी केल्याने क्षारांचा निचरा होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. खार जमिनीत भात खाचरे समपातळीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाचरातील पाण्याची पातळीही सारखी राहते व क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. रोपे २५ ते ३० दिवसांची झाल्यावर सरळ व उथळ लागवणी करावी. यामुळे फुटवा लवकर येण्यास मदत होते. तसेच एका चुडात चार ते पाच रोपे लावावी. निमगरव्या जातीसाठी दोन ओळींतील अंतर २० सेंटीमीटर व दोन चुडांतील अंतर १५ सेंटीमीटर ठेवून लावणी करावी. हळ्या जातींची लागवड १५ बाय १५ सेंटीमीटर अंतरावर करावी.

खार जमिनीमध्ये मुख्यत्वेकरून सुरुवातीला लव्हाळा व लोणकट हे तण आढळतात. जमीन ट्रॅक्टरच्या साहाय्याने साधारणत: २५ ते ३० सेंटिमीटर खोलीपर्यंत नांगरली तर तणांचा उपद्रव पुष्कळसा कमी होतो. नंतर शेतात पाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्यास हे तण नाहीशी होतात. खार जमिनीमध्ये हार नावाचे एक जलतण आढळते. या तणाचे पुनर्जीवन स्पोअर्सने होत असते. तसेच ते पाण्याखाली असल्याने कोणत्याही तणनाशकाचा त्याच्यावर योग्य तो परिणाम होत नाही. त्यामुळे हार तण आढळल्यास ताबडतोब बेणणी करावी. खार जमिनीत आंतरमशागत करणे गरजेचे आहे.

मत्स्यसंवर्धन

खार जमिनी पावसाळ्यामध्ये सतत पाण्याखाली असल्यामुळे भाताबरोबर मत्स्योत्पादन करणे शक्य आहे. खार जमिनीत क्षारांचा निचरा होण्यासाठी शेताच्या सभोवताली चरी काढाव्यात. पावसाळ्याच्या शेवटी शेतातील पाणी कमी झाले तरी अशा चरींत पाणी राहते. त्यामुळे या चरींचा मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग करून घेता येतो. सिप्रिनस या माशांचे संवर्धन केल्यास भात पीक काळात बऱ्यापैकी वाढ होते.

भूपृष्ठावरील तळी

खार जमिनीत पावसाळ्यात फक्त भाताचे पीक घेता येते. सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे रब्बी हंगामात पिके घेता येत नाहीत. खरीप हंगामातही खार जमिनीत भाताचे पीक रोपावस्थेत असताना पावसाचा आठ ते दहा दिवसांचा खंड जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते व रोपे करपतात. तळ्यांमध्ये पावसाळ्यातील गोडे पाणी साठवून त्याचा उपयोग शेतीसाठी करता येतो.

लागवडीबाबत काळजी

लागवडीच्या मानाने रहू किंवा आवटणी कमी खर्चाच्या असल्याने सुरुवातीला परवडतात; परंतु जसजशी जमीन सुधारत जाईल, तसतशी नेहमीच्या पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे करून लावणी करणेच हितावह ठरते. लावणी करताना रोपांचा चूड फार खोलवर लावू नये. चूड जास्त खोलवर लावला तर जमिनीच्या खालच्या थरात असलेल्या जास्त क्षारामुळे ते जळून जाण्याचा संभव असतो. खार जमिनीत विरळ पिकांचे मुख्य कारण हेच आहे.