शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार भ्रष्टाचारावर सभा वादळी

By admin | Updated: August 1, 2014 23:26 IST

कडवई हायस्कूल : पोषण आहार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सभा गाजली

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलची पालक सभा पोषण आहार भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चांगलीच वाजली. शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षण विभागाचा प्रतिनिधी आणि संस्थाचालक यांच्या उपस्थितीशिवाय पोषण आहाराबाबत निर्णय घेण्यास ग्रामस्थांनी असहमती दर्शवल्याने ही सभा संपवण्यात आली.भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पोषण आहाराचा तांदूळ मुख्याध्यापकाने परस्पर विकल्याचे उघड झाल्यानंतर परिसरात खळबळ माजली. त्यानंतर मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, महिना उलटून गेला तरीही मुख्याध्यापकास अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. या सर्व घडामोडीत भाईशा घोसाळकर हायस्कूलचे विद्यार्थी आजतागायत पोषण आहारापासून वंचित आहेत.याबाबत ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोषण आहार चालू करण्याबाबतचे पत्र पंचायत समिती शिक्षण विभागाकडून शाळेला देण्यात आले. याबरोबरच ही योजना बचत गटामार्फत चालवण्यात यावी, अशी सूचनाही देण्यात आली.पोषण आहार सुरु करण्यासाठी पालकांची एक विशेष सभा लावण्यात आली. या सभेला शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले होते. प्रत्यक्षात या सभेला प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचा प्रतिनिधी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरुवातीलाच नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. केंद्रप्रमुख साळुंखे यांच्याशी संपर्क केला असता वरिष्ठांच्या आदेशाशिवाय आपण सभेला उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर मात्र ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले.पोषण आहाराची झालेली अफरातफर ही बाब गंभीर आहे. मात्र, प्रशासनाने केलेले दुर्लक्ष ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया सभेमधून व्यक्त करण्यात आली. या घटनेचा जाहीर निषेधही करण्यात आला.पोषण आहाराचे नियोजन करण्यापूर्वी झालेल्या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांवर कारवाई व्हावी व नियोजन करण्यासाठी ग्रामस्थांची एक विशेष सभा तातडीने लावण्यात यावी. या सभेला शिक्षण विभागाचा जबाबदार प्रतिनिधी, प्रभारी मुख्याध्यापक तसेच संस्थेचे सर्व संचालक उपस्थित असावेत, असा ठरावही करण्यात आला. गैरहजर संचालकांनी आपले राजीनामे सादर करावेत अन्यथा ग्रामस्थांनी त्यांचे राजीनामे घ्यावेत, असे ठरावही या सभेत करण्यात आले. (वार्ताहर)