शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर तालुक्यातील नक्षत्र वन धोक्यात

By admin | Updated: August 28, 2015 23:43 IST

वन विभागासमोर आव्हान : दोन हेक्टर चौरस फूट क्षेत्रावरील लागवड वाया

संकेत गोयथळे - गुहागर  जिल्हा नियोजन निधीमधून समुद्रकिनारी तब्बल दोन हेक्टर चौरसफूट क्षेत्रावर वन विभागामार्फत लागवड करण्यात आली होती. मात्र, वनामध्ये लागवड केलेल्या २ हजार ९६३ सेवांमधील अर्ध्याहून अधिक झाडे समूळ नष्ट झाली आहेत, तर काही कोमजलेली आहेत. यामुळे कायमस्वरुपी हे नक्षत्रवन भविष्यात चांगल्या स्थितीत टिकवून ठेवणे वन विभागासाठी आव्हानात्मक काम ठरणार आहे.एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा, असे सांगितले जाते. मात्र, लावलेली झाडे जोपासायची कुणी? असा सवाल केला जात आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे वनमंत्री तसेच पालकमंत्री असताना गुहागर समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधांसह विरंगुळा व माहितीसाठी १२ राशी, २७ नक्षत्रे व नक्षत्रांचे आराध्य वृक्ष यांच्या लागवडीचे नक्षत्रवन व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून २०१०-११मध्ये निधी उपलब्ध करुन दिला. गुहागर वन विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोन हेक्टरमध्ये २ हजार ९६३ रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये एक हेक्टरमध्ये २ हजार ६०० सुरुची झाडे व एक हेक्टरमध्ये ३०८ औषधी वनस्पती व नक्षत्रवनामध्ये विविध ५५ रोपे लावण्यात आली.नक्षत्र वनामध्ये खैर, आवळा, नागकेशर, सावर, कुंचला, मोहा, शमी, कदंब, रुई, फणस, नीम, जांभूळ, पिंपळ, पळस, पायर आदी शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामधील बेल, जाई व काही झाडेवगळता बहुतांश झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, अशी स्थिती आहे. खासकरुन पावसाळ्यात जोराचा पाऊस व दमट हवामान यामुळे चार महिने झाडे कोमेजतात व त्यानंतर नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांना पालवी फुटते असे वनाधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. नर्सरीसाठी लावलेली बहुतांश झाडे मेली असून आता एकही झाड दिसत नाही. तसेच एक हेक्टरमध्ये लावलेल्या सुरुमधील समुद्री भरतीमुळे शेकडो झाडे सुरु उन्मळून समूळ नष्ट झालेली दिसत आहेत. नक्षत्र वनाच्या समुद्राकडील पाण्याच्या दिशेने पाण्याचा तडाखा बसू नये म्हणून लावलेली सुरूची बहुतांश झाडे उन्मळून पडल्याने भरतीचे पाणी थेट नक्षत्रवनामध्ये घुसत असल्याने ही अनेक झाडे मेली आहेत. अशी काही झाडे वन विभागाने पुन्हा लावली आहेत. मात्र, पुन्हा तीच स्थिती कायम राहिल्याने असणारी झाडे कशा प्रकारे जगवावीत हे आव्हान आहे.मे २०१५मध्ये केलेल्या पाहणी अहवालानुसार औषधी वनस्पती ९० टक्के, नक्षत्रवन ७१ टक्के व सुरूची झाडे ७९ टक्के अस्तित्त्वात असल्याची माहिती वनपाल राजश्री कीर यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात या पावसाळी हंगामानंतर एवढी झाडे आता अस्तित्त्वात नाहीत, असे चित्र आहे.