शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मरची... ४ मेरोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
4
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
5
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
6
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
7
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
8
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
9
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
10
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
11
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
12
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
13
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
14
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
15
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
16
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
17
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
18
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
19
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
20
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व कामांना महावितरणचे प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST

रत्नागिरी : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची ...

रत्नागिरी : वीज ग्राहकांना पावसाळ्यात अखंडित, सुरक्षित व दर्जेदार वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे प्राधान्याने पूर्ण केली जाणार आहेत. तशा सूचना कोकण परिमंडलातील सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

कोकण भौगोलिकदृष्ट्या जंगल, डोंगर, दऱ्या यामध्ये वसलेला आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे प्रत्येक वीज वाहिनीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर येणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात, अशा सूचना सर्व शाखा अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक साधन सामग्री वायर्स, इन्स्युलेटर, आदी पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याबाबत सर्व विभागीय कार्यालयाने वेळीच दक्षता घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

गतवर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात वीज वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले होते; परंतु महावितरण कंपनीने खंबीर पावले उचलून बाधित यंत्रणा रेकॉर्ड ब्रेक कालावधीत पुन्हा उभी केली होती. निसर्ग चक्रीवादळ, फयान वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील वीज यंत्रणेला कामाचाही मोठा अनुभव मिळाला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात किरकोळ घटना वगळता वीज पुरवठा सुरू राहील, असा विश्वास महावितरणच्या अधिकाऱ्यांना आहे.

रत्नागिरी शहराला अखंडित वीजपुरवठा राहावा, यासाठी २२० किलोवॅट वाहिनीचे निवळी ते कुवारबाव दुपदरीकरण करण्याचे काम महापारेषण कंपनी लवकरच पूर्ण करणार आहे. यामुळे शहरासाठी भविष्यात पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास तीन पर्याय उपलब्ध राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड (मंडणगड), शिवणे (गुहागर), ओणी (राजापूर) आणि साडवली (संगमेश्वर), आदी नव्याने बांधलेली विद्युत उपकेंद्रे आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक दर्जेदार व अखंडित सुरू राहणार आहे.

गावखडी ते पावस अशी स्वतंत्र नवीन पर्यायी वाहिनी कार्यरत झाल्याने त्या परिसरातील पावसाळी वीज पुरवठा अखंडित सुरू राहणार आहे. रत्नागिरी शहरातील भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर पावसाळी आणि वादळी हवामानातही सातत्यपूर्ण, सुरक्षित वीज पुरवठा सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाहिन्यांवर झुकलेली झाडे, फांद्या यांची वेळीच साफसफाई करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज वाहिन्या तुटणे, त्यामुळे होणारे अपघात टळण्यास मदत होणार आहे.

....................

कोकण परिमंडलांतर्गत मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत. त्यासाठी महावितरण कंपनीची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. या कामकाजासाठी काही काळ वीज पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्ती कामासाठी वीज ग्राहकांनीही सहकार्य करावे.

- देवेंद्र सायनेकर, प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल, रत्नागिरी.