शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

कोरोना खर्चासाठी नेत्यांचे मानधन, कर्मचाऱ्यांचा पगार उसना घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:29 AM

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला ...

देवरुख : राज्यात ६०,००० पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह येत असून, ३०० च्या आसपास रुग्णांचा मृत्यू होत आहे. आवश्यक असलेला लॉकडाऊन करु नये म्हणून विरोध, आंदोलने करुन लॉकडाऊन हाणून पाडणे, बेधडकपणे सण साजरे करणे, मास्क न वापरणे सामाजिक अंतर न ठेवणे, या निष्काळजीपणाची जबर किंमत सर्वांनाच मोजावी लागणार आहे. वाढत असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे सरकारी खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व अजूनही वाढणार आहे. यावर उपाय म्हणून आपत्कालीन परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने सर्व नेत्यांचे महिन्याचे मानधन व सर्व कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार उसना घ्यावा व व्याजासह दिवाळीत परत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केली आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक यांनी वर्षभर अनेक कळा सोसल्या आहेत. कोरोना आपत्तीची तीव्रता लक्षात घेता राजकीय पुढारी व कर्मचारी एखाद्या महिन्याचे मानधन व पगार व्याजासह उशिरा मिळणार असेल तर निश्चित कर्तव्य म्हणून कळ सोसतील, असा विश्वास आर्ते यांनी व्यक्‍त केला आहे. प्रचंड प्रमाणावर होत असलेल्या खर्चासाठी तातडीने पैसे उपलब्ध करण्यासाठी अशा पद्धतीची उपाययोजना राबविण्यात यावी. यासाठी सर्वांनीच आग्रही मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

व्यापारी, शेतकरी, कामगार व हॉटेल व्यावसायिक, संस्था, संघटना आपापल्या पद्धतीने कोरोना संकटाला सामोरे जात असताना नेते व कर्मचाऱ्यांनीही काही कालावधीसाठी थोडी कळ सोसून या संकटात एकमेकांना मदत करावी, अशी अपेक्षा आर्ते यांनी व्यक्‍त केली आहे.