शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर प्रकल्प मंजुरीचे स्वागत : केळुसकर

By admin | Updated: April 16, 2015 00:03 IST

विरोध प्रकल्पाला नव्हे विकासाला

कणकवली : भारताच्या जलद विकासाची घोडदौड रोखण्यासाठी अमेरिकेने भारतामध्ये होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पांना खो घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यात अरेवा आणि एल अ‍ॅण्ड टी या कंपनीशी करार करून जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामाला चालना दिली आहे. आम्ही या मंजुरीचे स्वागत करतो. भाजपासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे विकासाला विरोध आहे, अशी प्रतिक्रिया कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी व्यक्त केली.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मंजुरीच्या अनुषंगाने कोकण विकास आघाडीच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक आघाडीच्या मुंबई- दादर येथील मुख्य कार्यालयात सोमवारी झाली. यावेळी केळुसकर बोलत होते. यावेळी सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, खजिनदार सुरेश केळुसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब, मुख्य संघटक प्रकाश तावडे, रमाकांत जाधव, भाई चव्हाण, भिकाजी जाधव, चंद्रकांत आंबे्र, राजेंद्र केळुसकर आदी उपस्थित होते.
केळुसकर यांनी, रायपाटण येथे झालेल्या कोकण विकास आघाडीच्या ३२व्या अधिवेशनामध्ये ठराव मांडून आम्ही जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला आहे. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या जैतापूर परिसरातील स्थानिक नेत्यांनी आम्हाला विरोध केला होता. कोणत्याही राष्ट्राचा विजेच्या मुबलक पुरवठ्याअभावी विकास होऊ शकत नाही. अणुऊर्जा हा विजेचा मुख्य स्त्रोत आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करताना शिवसेनेच्या नेत्यांनी या अणुऊर्जेबाबत आपले अज्ञान प्रकट करताना स्थानिक लोकांच्या मनात अनाठायी भीती निर्माण केली होती. त्यामुळे आंदोलन होऊन एका कार्यकर्त्याला स्वत:चा जीव नाहक गमवावा लागला होता, असे म्हणाले.
ते म्हणाले, आपल्या देशात १९५२ पासून मुंबईनजीकच्या तुर्भे अणुऊर्जा प्रकल्पासह अलिकडील कारवार येथील प्रकल्प सुरक्षितपणे सुरू आहे. अद्ययावत उच्च बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे कितीही मोठी नैसर्गिक संकटे आली तरी या प्रकल्पाची साधी वीटही हलणार नाही. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळावा म्हणून आम्ही ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला. शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाचा त्यामुळे विरोध मावळला. मात्र, मताच्या राजकारणासाठी शिवसेनेची नेतेमंडळी नाहक मुद्दा घेऊनच वाटचाल करीत आहे. या प्रकल्पामध्ये एक लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


जैतापूर प्रकल्पाबाबत मुंबईत कोकण विकास आघाडीची तातडीची बैठक.
मताच्या राजकारणासाठी सेनेचा विरोध : केळुस्कर.