शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By admin | Updated: May 20, 2015 23:58 IST

आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे

मालवण : मालवण शहरातील फातिमा आश्रमाच्या विहिरीचे पाणी दूषित झाल्याने येथील अनाथ मुलांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून या मुलांना पायपीट करून इतर ठिकाणांहून पाणी आणावे लागत आहे.मालवण तहसील कचेरी रोडवर असलेल्या फातिमा आश्रम येथे अनाथ मुलांना शिक्षण व राहण्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी यावर्षी ३५ मुले व सिस्टर तसेच मदतनीस मिळून ४० ते ४५ सदस्य या आश्रमात आहेत. आश्रम परिसरात पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. परंतु उन्हाळ्यात तिचे पाणी कमी झाले असून ते क्षारयुक्त बनले आहे. पाणी पिण्यास अयोग्य बनल्याने पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून आश्रमाकडून नगरपालिकेकडे नळपाणी योजनेसाठी पैसे भरण्यात आले आहेत. मात्र, उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरीही नळजोडणी पालिकेने केलेली नाही.पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने येथील अनाथ मुलांना पाण्यासाठी वणवण करावी लागली आहे. आश्रमात पिण्यास पाणी नाही. तसेच नगरपालिकेनेही याकडे दुर्लक्ष केले आहे अशी तक्रार आश्रमाच्यावतीने शिवसेना उपशहरप्रमुख सन्मेश परब यांच्याकडे करण्यात आली. याप्रश्नी तत्काळ लक्ष घालत शिवसेना नगरसेवकांच्या माध्यमातून व शहर विकास आघाडीच्या सहकार्याने या प्रश्नी नगरपरिषदेला जाब विचारून तत्काळ पाणी उपलब्ध केले जाईल असे सन्मेश परब यांनी सांगितले.याबाबत नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधला असता आश्रमाकडून पैसे भरणा झाले आहेत. मात्र, कनेक्शनपासून आश्रमापर्यंत पाईपलाईन टाकण्याबाबत आश्रमाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने नळजोडणीस दिरंगाई झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)