शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना स्वतंत्र ग्रामपंचायत

By admin | Updated: July 4, 2014 00:19 IST

३५० ते १००० लोकसंख्येचा निकष

रत्नागिरी : विविध प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीची लोकसंख्या ३५० ते १००० असेल, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे अशा वसाहतींची निधीअभावी रखडणारी अनेक कामे मार्गी लागण्याची आशा आहे. आता प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतींची जनगणना महसूल यंत्रणेमार्फत केली जाणार असून, किती ग्रामपंचायती नव्याने स्थापन होणार, ही माहिती त्यानंतरच पुढे येईल.जिल्ह्यात पोयनार, गडनदी, अर्जुना, शेलारवाडी, वाघिवरे यांसारख्या प्रकल्पांमुळे हजारो प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झाले. मात्र, ते गेली कित्येक वर्षे विकासापासून दूरच राहिले. प्रकल्प यंत्रणा आणि शासन यांच्या आडमुठ्या धोरणामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांसमोर आजही अनेक समस्या उभ्या आहेत. प्रकल्पांसाठी जमीन घेण्यापूर्वी ग्रामस्थांना अनेक प्रलोभने दाखविण्यात येतात; पण पुनर्वसन झालेल्या ठिकाणी योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या ग्रामस्थांचे खूपच हाल होतात. मात्र, आता नव्या शासन निर्णयामुळे हे हाल संपण्याची आशा निर्माण झाली आहे.कमीत कमी २००० लोकसंख्या असलेल्या महसुली गावांत स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात येते. आदिवासी तांडा या भागातील किंवा दोन गावांमध्ये तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असेल, तर त्या भागाकरिता किमान लोकसंख्या १००० असणे आवश्यक आहे, असे ग्रामपंचायत स्थापनेचे निकष आहेत. पाटबंधारे प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वसाहती या प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये असल्याने शासनाच्या जाचक अटींमुळे शेजारच्या ग्रामपंचायतींपासून दूर असूनही या वसाहतींमध्ये आतापर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त मूलभूत सोयी-सुविधांपासून नेहमीच वंचित राहिले आहेत.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने आतापर्यंतच्या प्रकल्पग्रस्तांच्या परिस्थितीचा विचार करून स्वतंत्र महसुली गाव म्हणून जाहीर केलेल्या वसाहती, गावांना लोकसंख्येची अट शिथिल करून यापुढे किमान ३५० ते १००० लोकसंख्या असलेल्या पुनर्वसित महसुली गावात ग्रामपंचायती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कार्यालय, कर्मचारी वर्गही शासनाकडून देण्यात येणार आहे. प्रकल्पांमुळे पुनर्वसित झालेल्या वसाहतींसाठी ग्रामपंचायत स्थापन होण्याच्या दृष्टीने तलाठी किंवा महसूल यंत्रणेकडून या गावठाणांची जनगणना झाल्यानंतरच पात्र गावठाणांसाठी ग्रामपंचायतींचे निकष लागू होतील. यादृष्टीने पुनर्वसन विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)