शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोकणी मेवा विक्रीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

ग्रामसमित्या कार्यान्वित रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती ...

ग्रामसमित्या कार्यान्वित

रत्नागिरी : कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पूर्वीप्रमाणे प्रत्येक गावातील व शहरातील ग्राम व वाॅर्ड सनियंत्रण समिती कार्यान्वित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून आरोग्य तपासणी करण्याची सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिल्पा नाईकचे यश

दापोली : ‘होय आम्ही शेतकरी’ फाऊंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय फळे आणि भाजीपाला केक स्पर्धेत येथील डाॅ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक शिल्पा नाईक यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. राज्यभरातून १३०० पेक्षा अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले होते.

सभेसाठी मुदतवाढ

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सहकारी संस्थांना वार्षिक सर्वसाधारण सभा दि.३१ डिसेंबरपर्यंत घेण्याची मुदत देण्यात आली आहे. सहकार कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहकारी संस्थांनी आपल्या कारभाराचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. संस्थांनी सप्टेंबर अखेर वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन वार्षिक लेखा परीक्षण अहवालास मंजुरी घेणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी

रत्नागिरी : जिल्हा नियोजनच्या निधीपैकी सर्व ग्रामपंचायतींना ८० टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे गावांमध्ये विकासकामे होणार आहेत. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग ग्रामपंचायतींना विकासकामासाठी प्राप्त होणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे.

नागरिकांनी संयम ठेवावा

रत्नागिरी : संयम ठेवा, काळजी घ्या, संकटाचे हेही दिवस जातील. कोरोना रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसताच जवळच्या दवाखान्यात तपासणी करून घ्या.

नागरिकांची गैरसोय

रत्नागिरी : शहरात रस्त्यालगत भाजी, फळे विक्रीसाठी प्रशासनाने बंदी केली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. किराणा दुकानेही बंद आहेत. घरपोच सेवा देणारे विक्रेते कमी असल्याने घरातील उपलब्ध साहित्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे.

साथीचा धसका

रत्नागिरी : तापसरी, सर्दी,पडसे आदी साथरोगांचा धसका नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे साधा ताप असला तरी डाॅक्टरांकडे जाणे नागरिक टाळू लागले आहेत. परिचित डाॅक्टर किंवा औषध विक्रेत्यांकडून औषधे घेऊन आजारावर मात करीत आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.