शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणात कितीजण ? आज ठरणार

By admin | Updated: October 1, 2014 01:06 IST

विधानसभा निवडणूक : चिपळुणात अपक्ष उमेदवाराची माघार

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कामात आरटीओ कार्यालयातील कर्मचारीही व्यस्त झाल्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील आरटीओ कार्यालयातील कामकाज पूर्णपणो ठप्प झाले आहे. हे पाहता महत्त्वाचे काम असेल तरच कार्यालयात या अन्यथा थेट निवडणुकीनंतर भेटा, असे आवाहन अधिका:यांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. 
15 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून त्याची जय्यत तयारी केली जात आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी सरकारी कर्मचा:यांचा समावेश केला जातो. लोकसभा निवडणुकीप्रमाणोच यंदाही सरकारी कर्मचा:यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश केला जात असून, राज्यातील आरटीओ अधिकारी आणि कर्मचा:यांचाही समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील तीन महत्त्वाच्या आरटीओ कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचारीही निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना कामासाठी खेटे  मारावे लागत आहेत. निवडणुकीतील व्यस्त वेळापत्रकामुळे आरटीओतील कामकाजासाठी अपुरे मनुष्यबळ पडत असून नवीन ड्रायव्हिंग लायसन्स देणो, नूतनीकरण करणो, दंड भरणो आदी कामे पूर्णपणो रखडली आहेत. हे पाहता नागरिकांनी काही महत्त्वाचे काम असेल तरच आरटीओ कार्यालयात यावे, अन्यथा थेट निवडणुकीनंतर यावे, असे आवाहन आरटीओ अधिका:यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
 
वडाळा आरटीओत जवळपास 90 कर्मचारी असून, यातील 35 कर्मचारी, अंधेरी आणि त्या अंतर्गत येणा:या बोरीवलीत साधारण 124 कर्मचारी कार्यरत असून, यातील जवळपास 110 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. तर ताडदेव कार्यालयातील जवळपास 70 पैकी 40 ते 50 कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. सध्या कर्मचारी या कामासाठी जात असतानाच ऑक्टोबर महिन्याच्या 7, 8, 14 आणि 15 तारखेला त्यांना पूर्णपणो डय़ुटी लागल्याचे आरटीओतील सूत्रंनी सांगितले. 
 
1अंधेरी आरटीओ अधिकारी पी. जी. भालेराव यांनी सांगितले की, कर्मचारी नसल्याने कामे पूर्णपणो रखडली आहेत. आरटीओ कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. 
2ताडदेवचे आरटीओ अधिकारी के. टी. गोलानी यांनी सांगितले की, कर्मचारी निवणुकीच्या कामात व्यस्त असल्याने आता कामे रखडू लागली आहेत. 
3त्यामुळे नागरिकांनी निवडणुकीनंतरच यावे, असे आवाहन आम्ही प्रत्येकाला करीत आहोत. महत्त्वाचे काम असेल तरच या, असेही त्यांना सांगत आहोत.