शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

हाॅटेल्सची पार्सल, घरपोच सेवा आहे म्हणून जिभेचे चोचले करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेतही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेतही वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने हाॅटेल्स सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. मात्र, पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहेत. मात्र, सध्या पावसाळा सुरू असल्याने नागरिकांनी पोटाचे आरोग्य सांभाळावे, त्यासाठी बाहेरचे खाणे सध्या तरी थांबवावे, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे पहिल्या लाटेत हाॅटेल्स बंद ठेवण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये संसर्ग कमी झाल्यानंतर ५० टक्के क्षमतेवर सुरू करण्यात आली. मात्र, पुन्हा मार्चमध्ये संसर्ग वाढताच केवळ पार्सल सेवा आणि घरपोच सेवा सुरू आहे. त्यामुळे खवय्यांची पावले पुन्हा हाॅटेल्सकडे वळली आहेत. परंतु, पावसाळ्यात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे नागरिकांनी बाहेरचे खाणे टाळावे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

पावसाळ्यात हे खायला हवे

n अधिकाधिक घरातील अन्न किंवा पदार्थ खावेत.

n गार अन्न न खाता ते गरम असलेले खावे. जेणेकरून पचनाबरोबरच घशाचे विकार होणार नाहीत.

n पचनाला हलके असलेले, गरम असे पदार्थच आहारात असावेत.

n या काळात पचनक्रिया क्षीण असल्याने आहार शक्यतो कमी घ्यावा.

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

n पावसाळ्यात रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावेत.

n शिळे पदार्थ, आंबलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे पोट बिघडते.

n काेल्ड्रींक्स, आईस्क्रिम, सरबत अशी पेये. गार पदार्थ या काळात खाऊ नयेत.

n दुग्धजन्य पदार्थ कमी खावेत.

n पाणी शक्यतो उकळून तसेच गरम सोसेल असे पिण्यासाठी घ्यावे.

रस्त्यावरचे अन्न नकाेच

पावसाळ्यात सर्वत्र दूषित पाणी असते. रस्त्यावरच्या उघडे अन्न अथवा खाद्यपदार्थांवर माशा बसत असतात. त्यामुळे आधीच पचनशक्ती मंदावलेली असल्याने हे उघडे अन्न खाल्ल्याने त्यापासून पोटाचे आजार होण्याची शक्यता असते. या काळात पचनसंस्था अतिशय मंदावलेली असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही क्षीण झालेली असते. त्यामुळे अन्न किंवा खाद्यपदार्थ बाहेरचे न खाता घरचेच सकस अन्न खाण्यावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर गार झालेले पदार्थ आवर्जून टाळावेत, त्यामुळे पोटाबरोबरच घशाचे विकारही वाढतात. बाहेरचे अन्न शिळे तसेच त्यात वापरले जाणारे घटक हानीकारक असतात. त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी हितकारक असते.

पावसाळ्यात पचनक्रिया क्षीण झालेली असते. जुन्या काळी आषाढ महिना रोगराईचा महिना मानला जात असे, ते योग्यच आहे. पाणी साचल्याने ते दूषित होते. त्यामुळे पावसात रोगराई वाढते. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. म्हणूनच पावसाळ्यात बाहेरचे अन्न न खाता घरचेच गरम आणि सकस, ताजे अन्न् खावे. पालेभाज्या, फळे याकाळात शक्यतो टाळावीत.

- डाॅ. ज्ञानेश विटेकर, फिजिशियन, रत्नागिरी

आहारतज्ज्ञ काय म्हणतात?

पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे ताजे आणि सकस अन्न् खाल्ले नाही तर पोटाचे विकार बळावतात. त्यामुळे घरातील अन्न खाण्यावरच अधिक भर असावा. या काळात उष्ण पदार्थ खाण्यावर भर असावा. अन्न कमी खावे आणि ते पचायला हलके असे असावे. या काळात वात उच्चस्थितीत असल्याने वात वाढेल, असे थंड पदार्थ खाऊ नयेत. बाहेरचे दुग्धजन्य पदार्थही टाळावेत.

- वैद्य सिद्धेश जोशी, रत्नागिरी