शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सात महिन्यांनी कागदपत्रे हाती

By admin | Updated: November 7, 2015 22:39 IST

गुहागर तालुका : शृंगारतळी डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार

शृंगारतळी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन नोंदणीची कागदपत्रे सात महिन्यानंतर वाहनचालकाच्या ताब्यात मिळाल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील शृंगारतळी डाकघर कार्यालयात घडला आहे. या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर ही कागदपत्र पोस्टमनने दुसऱ्याच व्यक्तीच्या हाती सोपवल्याचे पुढे आले. त्या व्यक्तीने ही कागदपत्रे आपल्याकडे चक्क सात महिने ठेवली होती. या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.एप्रिल महिन्यात रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पाठवलेली वाहन नोंदणीची कागदपत्रे चक्क सात महिन्याने संबंधीत व्यक्तीला मिळाली आहेत, ती ही एका अनोळखी व्यक्तीकडे. या प्रकारावरुन डाकघर कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. शेवटी वाहन मालकालाच स्वत: कागदपत्रे शोधण्यासाठी धावपळ करावी लागली आहे. प्रादेशिक कार्यालयात वाहनांची नोंदणी होऊन सात महिने उलटून कागदपत्रे मिळाली नाही म्हणून त्या व्यक्तीने उपप्रादेशिक विभागात संपर्क साधला. त्यावेळी सहा महिन्यांपूर्वीच स्पीड पोस्टाने पार्सल पाठवल्याची माहिती मिळाली. शृंगारतळी डाकघरात याबाबत विचारले असता आम्ही पत्र दिलेले आहे असे सांगण्यात आले. मात्र, पत्राची पोचपावती पाहिल्यावर एका अनोळखी व्यक्तीने सही करुन पत्र सोडवून घेतल्याचे दिसले. याबाबत जाब विचारला असता तुम्ही लेखी तक्रार करा, मग आम्ही चौकशी करु की तुमचे पत्र कुठे गेले आहे, असे सांगण्यात आले. चौकशीत आमची चूक असली तरी आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकाराला पोस्टमनच कारणीभूत आहे कारण पत्र वाटण्याची जवाबदारी पोस्टमनची आहे, असे म्हणत येथील अधिकाऱ्याने यातून अंग काढले. सही करणाऱ्याचा शोध घेतल्यानंतर त्या व्यक्तीने सात महिने पार्सल संबंधिताला न देता स्वत:जवळ ठेवले होते. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारीवर्ग जवाबदारी झटकत असतील तर लोकांची कागदपत्रे ही आता रामभरोसेच सोडावी लागणार आहेत. मात्र, याठिकाणी काम करणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे डाक खात्याला याचा फटका बसणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर) 

कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती

एखाद्या व्यक्तीच्या नावाने आलेली महत्वाची कागदपत्रं ही त्याच व्यक्तीच्या हाती देणे बंधनकारक आहे. त्यामुळेच अशी कागदपत्रं कुरिअरने न पाठवता विश्वसनीय अशा डाक कार्यालयामार्फत पाठवली जातात. जेणेकरून ती गहाळ न होता त्याच व्यक्तीच्या हाती पडावीत. मात्र, शृंगारतळी परिसरात कोणाचेही टपाल कोणाच्याही हाती दिले जात असल्याचे सदर प्रकारावरुन दिसून येत आहे.