शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री

By admin | Updated: March 26, 2015 00:08 IST

यंत्रणेचे डोळ्यावर हात : कडक कायदे आहेत पण...

रत्नागिरी : राज्यात गुटखाबंदी होऊन बराच कालावधी झाला. त्याबाबत अत्यंत कडक कायदे करण्यात आले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात छोट्या टपरीपासून ते मोठ्या दुकानांमधूनही परराज्यातून येणाऱ्या अनेक ब्रॅँडच्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असून, अन्न व औषध प्रशासनाने याबाबत डोळ्यावर हात घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राज्यातील फडणवीस सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. अन्न व प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत त्याबाबत घोषणाही केली.याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप जनतेतून होत आहे.गुटखाबंदी प्रामाणिकपणे व्हावी, असे जनतेला वाटते. शासनानेही त्यासाठी कायदा बनवला. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही राज्यातील अन्य भागांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही सर्वत्र खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. त्याबाबत पोलीस, अन्न व औषध प्रशासन यांनी डोळ्यावर हात ठेवल्याचा आरोपही होत आहे. राज्यातील गुटखा उत्पादन सरकारने बंद केले. परंतु गोवा, कर्नाटक व अन्य राज्यात गुटखा निर्मितीवर बंदी नाही. तेथे उत्पादित गुटखा ट्रकमधून जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. रत्नागिरीतही हीच स्थिती आहे.गुटख्याचे काही मोठे स्टॉकिस्ट असल्याचीही चर्चा आहे. याबाबत नुकतीच अन्न व औषध प्रशासनाने एमआयडीसीतील एका गोदामावर टाकलेली धाड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. शासनाने आदेशाचा चाबूक उगारला की कारवाई करायची, इतरवेळी डोळ्यांवर हात ठेऊन काही घडलेच नाही, असे चित्र निर्माण करायचे, ही स्थिती कधी बदलणार असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)


दुकान तपासणीत गुुटखाच सापडला नाही?
राज्यात गेल्या वर्षभरात ७२ हजार दुकानांची तपासणी करून ३२ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती या खात्याचे मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत दिली आहे. राज्यात एवढ्या मोेठ्या प्रमाणात दुकानांची तपासणी झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यात मात्र वर्षभरात अन्न व औषध प्रशासनाने केवळ दीडशेच दुकानांची तपासणी केली. जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होत असताना या तपासणी झालेल्या सर्व दीडशेपैकी एकाही दुकानात एकही गुटख्याचे पाकीट, पाऊच प्रशासनाला सापडला नाही, असा दावा करण्यात आला आहे. सात रूपयांचा गुटखा ५0 रूपयांना विकला जातो. उघडपणे त्याची विक्री होते, मात्र संबंधित खात्यांना त्याची माहिती नसते आणि ते करत असलेल्या तपासणीत तो सापडतही नाही. हीच आश्चर्याची बाब आहे.