शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
2
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
3
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
4
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
5
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
6
Virat Kohli : किंग कोहलीचा विक्रमी धडाका! IPL इतिहासात कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
7
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
8
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
9
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
10
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
11
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
12
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
13
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
14
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
15
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
16
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
17
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
18
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
19
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
20
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रात सांगलीचे तिघे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 23:57 IST

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना ...

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात सांगली येथील तिघेजण बुडाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्यादरम्यान घडली. यातील दोघांना वाचविण्यात यश आले असून, सुनील लक्ष्मण हदिमणी (वय ३१, रा. हनुमंतनगर, सांगली) याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह भंडारपुळे समुद्रकिनाऱ्याजवळ दुपारी ३.३० वाजण्याच्या दरम्यान आढळला.
गणपतीपुळे येथे मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्त विविध भागातून भाविक दाखल झाले होते. यात्रेची सांगता दुसºया दिवशी दुपारपर्यंत केली जाते. सांगली जिल्ह्यातील सहाजण मंगळवारी १७ रोजी दुपारी २ च्या सुमारास पिकअप गाडीने गणपतीपुळेकडे निघाले. रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला ते गणपतीपुळे येथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी देवदर्शन करुन मुक्काम केला . बुधवारी तेथून निघण्यापूर्वी सुनील लक्ष्मण हरिमणी, दत्तात्रय हिप्परकर (रा. अहिल्यानगर, सांगली), सदाशिव डफळापुरे (रा. हनुमंतनगर, सांगली), दत्तात्रय सिद्धप्पा घुगरे (३०, रा. हनुमंतनगर, सांगली), मधु भिमराव बसभित (३०, रा. विजयनगर, सांगली), राजकुमार दºयाप्पा घुगरे (३४, रा. कोल्हापूर रोड) हे सर्वजण सकाळी ८ वाजण्याच्या दरम्याने समुद्रात आंघोळीसाठी उतरले. त्यातील तिघेजण खोल समुद्राच्या पाण्यात जावू लागले. त्यात सुनील हदिमणी लाटेत अडकल्याने बेपत्ता झाला. त्याच्या पाठोपाठ जाणाºया दत्तात्रय हिप्परकर व सदाशिव डफळापुरे यांना वाचविण्यासाठी निखील सुर्वे व गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षकांनी पाण्यात उडी घेतली आणि त्यांना बाहेर काढले.
दरम्यान, समुद्रात बेपत्ता झालेल्या सुनील हदिमणी याचा मृतदेह दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तेथूनच जवळ असणाºया भंडारपुळे समुद्रकिनारी असणाºया स्मशानभूमीसमोर शोधपथकाला आढळला. मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दोन दिवसांत दुसरी घटना

गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थीच्या दिवशीच सांगली येथील दोन तरुणांना समुद्रात बुडताना वाचविण्यात यश आले होते. अंगारकीच्या दुसºयाच दिवशी एक तरुण बुडून बेपत्ता झाल्याची घटना घडली. गणपतीपुळे येथे बाहेर गावाहून येणाºया पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने या दुर्घटना घडत आहेत. याबाबत येथे सूचना फलक लिहिलेला असूनही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वारंवार दिसत आहे.