शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहे. खरेदी-विक्रीसाठी शेतकरी, व्यापाऱ्यांची होणारी गर्दी पाहता, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. शिवाय मास्क तोंडाऐवजी कानाला अडकवून ठेवण्यात येत आहेत. अनेकजण मास्क वापरतच नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रात्रीपासून परजिल्ह्यांतील शेतकरी लिलावासाठी भाजीपाला घेऊन येत असतात. पहाटे साडेचार वाजता व्यापारी खरेदीसाठी आल्यानंतर लिलावाची बोली सुरू होते. साधारणत: दोनशे ते अडीचशे लोकांची गर्दी जमते. लिलाव झाल्यानंतर व्यवहार झाल्यावर भाजीपाला ताब्यात घेऊन व्यापारी, शेतकरी यांची पांगापांग होईपर्यंत सकाळचे नऊ वाजतात. त्या दरम्यान भाजीपाला ताब्यात घेणे, वाहनांत चढविणे या गोष्टी घडत असतात. लिलावासाठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास येते. त्यातच कित्येकांनी मास्क परिधान केलेला नसतो, तर काही ग्राहकांचा मास्क कानाला असतो, तोंडावर नसतो. यामुळे पाच ते साडेपाच तासांच्या अवधीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने धोका वाढला आहे.

एकीकडे शासनाने ‘ब्रेक द चेन’साठी कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असताना लिलावाचे व्यवहार होताना निर्बंध का लावले जात नाहीत? शहराजवळील नाचणे येथे व्यवहार संपल्यानंतर विक्रेते शहर व आसपासच्या गावात भाजीविक्रीसाठी जात असतात. यामुळे ही मंडळी कित्येक लोकांच्या संपर्कात येत असल्याने संसर्ग फैलावला जात आहे. भाजीपाल्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये असल्याने लिलाव प्रक्रिया जरी गरजेची असली तरी कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे.