शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus Lockdown : तब्बल ३५ वाहनचालकांचे परवाने निलंबित, दुचाकी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 1:41 PM

विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.

ठळक मुद्देसंचारबंदी काळात पोलिसांकडून कारवाईविनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरी : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आता अत्यंत कडक भूमिका घेतल आहे.

विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली.राज्यात कोरोनाचा प्रकोप सातत्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोनाने सर्वांचेच जगणे मुश्किल केले आहे. हे संकट थोपविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. अनेक राजकीय, धार्मिककार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिक प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत आहेत. मात्र, काहीजणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० मार्चपासून रत्नागिरी शहरात विनाकारण किवा अत्यंत क्षुल्लक कारणे देत रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्यांवर कारवाई करून वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या १५ दिवसांच्या काळात पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी तसेच तीनचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्याअंतर्गत ५ हजारपेक्षा अधिक वाहनांकडून २० लाखांपर्यंत दंड वसुली करण्यात आली आहे.

त्यानंतरही वाहतूक नियम मोडण्याचे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण येणाऱ्या वाहनांची हवा सोडणे, गांधीगिरी करून वाहनधारकांना हात जोडून विनंती करणे यांसारखे अनेक उपाय योजण्यात आले. त्यानंतर आता वाहनांना जॅमर बसविण्यात आले आहे.

विनाकारण रस्त्यावर येणारी वाहने दंड झाल्यानंतरही पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्याने त्यांच्यावर अधिक कठोर कारवाईचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ही वाहनेच जप्त करून ठेवली तर पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, हे लक्षात घेऊन आता वाहनांवर जप्तीची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या असून, संबंधित वाहनचालकांचे वाहतुकीचे परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत.दरम्यान शहरातील व परिसरातील बहुतांश लोक हे कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करीत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र, घरात थारा न होणारे व संचारबंदी काळात शहरातील मोकळ्या रस्त्यांची पाहणी करण्यात व पोलिसांना कसे चकविले, यामध्ये धन्यता मानणाऱ्यांवरच आता पोलिसांचे लक्ष आहे. संचारबंदी काळात नाहक फेरफटका मारणाऱ्या व पोलिसांचे काम वाढविणाऱ्या या बेजबाबदार लोकांवर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कारवाई सुरूच राहणार आहे. 

कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शिवखोल व राजिवडा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरील होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात थांबली आहे. शहरात अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणत्याही वाहनांना रस्त्यावर येण्यास परवानगी नाही. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.- अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी