शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित

By admin | Updated: August 12, 2015 22:58 IST

संगमेश्वर तालुका : यंदा १३ कोटी ८५ लाखांचे अनुदान प्राप्त

देवरुख : अवकाळी पावसामुळे आंबाबागांचे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मात्र, नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांचा समावेश झाला नसल्याने संगमेश्वर तालुक्यातील हे शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. याबाबत काही गावातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे धाव घेतली आहे.आंबा - काजू उत्पादनाच्या हंगामातच निसर्गाच्या अवकृपेमुळे आंबा - काजू पीक चालू वर्षात म्हणजेच मार्च - एप्रिल २०१५च्या दरम्यान धोक्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांचे - बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कोकणातील आंबा - काजू नुकसानाची भरपाई द्यावी, याबाबत शासनाने निर्णय घेतला आणि दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानुसारच तालुका कृषी विभागाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला आणि सर्व्हेनंतरच संगमेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. मात्र, यावेळी काही ठिकाणी कार्यालयात बसूनच सर्व्हे झाल्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांवर त्यामुळे अन्याय झाल्याचे पुढे येत आहे.यादीमध्ये नाव नसलेल्या काही नागरिकांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. मात्र, कृ षी विभागाकडून आता आम्ही काहीच करु शकत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर आपली कैफियत मांडणारे निवेदन गोळवली गावातील शेतकरी उदय सैतवडेकर यांनी देवरुखच्या तहसीलदारांना दिले आहे.याबरोबरच सांगवे गावाच्या माजी सरपंच प्रज्ञा शेलार यांनी सांगितले की, आमच्या गावातील काही शेतकऱ्यांचा समावेश या यादीत झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा फेरविचार शासनाने करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच भरपाईसोबत शेती कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेशदेखील शासनाने दिले आहेत. यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे असतील, त्याच शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन होणार आहे. त्यामुळे यामध्येदेखील तालुक्याच्या अनेक गावातील अन्य शेतकरी वंचित राहणार असल्याचे उदय सैतवडेकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे राज्य शासनाने या वंचित शेतकऱ्यांचा विचार करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ८५ लाख रुपये इतकी नुकसान भरपाई आली असल्याचे तहसीलदार वैशाली माने यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी सहहिस्सेदारांनी संमत्तीपत्र करुन देणे गरजेचे असल्याचा आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कोकणामध्ये एका सात-बारावर अनेक नावे असतात. त्यातील काही हयातही नसतात, तर काही परगावी असतात. अशावेळी त्या जमिनीत राबणाऱ्या शेतकऱ्याला खरेतर त्याच्या श्रमाचे मोल मिळत नाही आणि अशी संमती न मिळू शकल्याने तालुक्यातील - जिल्ह्यातील अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनातर्फे संमतीपत्राची अट शिथील करुन हमीपत्र घेऊन नुकसानभरपाईचे वाटप करण्यात यावे.- यशवंत जाधव, शेतकरी, कोसुंब संमतीपत्राऐवजी ‘हमीपत्र’ करुन भरपाई देण्याची होतेय मागणी.काही गावातील शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे घेतली तहसीलदारांकडे धाव.नुकसानभरपाईसोबत शेती कर्जाचे पुनर्गठन करण्याचेही शासनाचे आदेश.शासनाच्या यादीत नावे असलेल्या शेतकऱ्यांचेच होणार पुनर्गठन.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचे होते आदेश.