शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील चितांचे निखारे सतत धगधगतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दापोली : स्मशानातील निखारे गेले काही दिवस सतत धगधगते असून, ते विझण्याची वेळच आलेली नाही. कोरोनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दापोली : स्मशानातील निखारे गेले काही दिवस सतत धगधगते असून, ते विझण्याची वेळच आलेली नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा वेग चाैपट वाढला आहे. दिवसागणिक चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. एकीकडे रुग्णांना बेड नाहीत आणि दुसरीकडे मृतदेहाला अग्नी देण्यासाठी स्मशानभूमी कमी पडत आहे.

आरोग्य यंत्रणेच्या निकषांप्रमाणे हे अंत्यसंस्कार केले जात आहेत. मात्र मृतांची संख्या वाढली असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी दापोलीत गेले आहेत. कोरोना दाखल झाल्यापासून वर्षभरात दापोलीत जेवढे मृत्यू झाले नव्हते, तेवढे मृत्यू एप्रिल महिन्यात झाले आहेत. २० दिवसांत तब्बल ४० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, दापोली नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आता दररोज चार ते पाच लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे एक चिता विझण्याआधीच दुसरा मृतदेह नेण्याची वेळ येत आहे.

गावबंदी, मृतदेह नाकारणे, अंत्यसंस्कारास नकार देणे, गावकऱ्यांचा विरोध यांसारख्या अनेक घटना गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी घडल्या आहेत. अशा कठीण काळातही दापोली नगरपंचायतीमधील आरोग्य स्वच्छतादूत मंगेश जाधव, संदीप डिंगणकर (मुकादम), दीपक गोरीवले, राजेश टांक, शैलेश पवार, राजेश जाधव, सचिन घाग, श्रीकांत पवार, अनिल चोरगे, दीपक भांबीड, संजय धोपट, गजानन म्हसकर, संतोष गायकवाड, स्वप्निल वाघमारे, प्रवीण गमरे हे कर्मचारी जीव धोक्यात घालून २४ तास काम करीत आहेत.

....................

अस्थायी कर्मचारी

कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करणारे हे कर्मचारी अस्थायी आहेत. त्यांना कोणतेही संरक्षण नाही. तरीही ते २४ तास जीव धोक्यात घालून काम करीत आहेत, याची सरकारने दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

तोडगा काढणार

दापोली आणि गुहागरमध्ये ग्रामपंचायतींनी मृतदेह नाकारल्याचे प्रकार घडले आहेत. त्याची दखल घेण्यात आली आहे. तालुका पातळीवरील स्मशानभूमीवर येणारा ताण पाहून आता पंचक्रोशीसाठी एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांना पीपीई किट पुरविण्यात येतील. तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी म्हटले आहे.