शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप मोफत धान्य मिळाले नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य ...

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाने दिलासा दिला आहे. मात्र, राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून केवळ एक म्हणजे मे महिन्याचे मोफत धान्य दिले असून, जूनचे धान्य ग्राहकांना पैसे मोजून खरेदी करावे लागणार आहे.

कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. मात्र, या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले. प्रधानमंत्री गरीब अन्न धान्य योजनेंतर्गत कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने केंद्राने जनतेला मोफत धान्य पुरविले होते. त्यावेळीही राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावरच सोडले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने जनतेसाठी दोन महिने मोफत धान्य वितरणाचा निर्णय जाहीर केला. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील कार्डधारकांना हे धान्य दिले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र केंद्राने मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य जनतेला दिले असून, त्याचे वितरणही सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ मे या एकाच महिन्याचे धान्य मोफत दिले असून, जून महिन्याचे धान्य दिलेले नाही. याबाबत कोणतेचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला जून महिन्याचे धान्य विकत घ्यावे लागणार आहे.

राजापूर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ४३१ कार्डधारक असून, प्राधान्य कुटुंब लाभ योजनेंतर्गत २६ हजार ५८५ कार्डधारक व १ लाख ४३ हजार ९६ इतके लाभार्थी आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू याप्रमाणे २९३ टन तांदूळ व १८९ टन गहू उपलब्ध करून दिला आहे, तर अंत्योदय लाभार्थींसाठी जाहीर केलेला प्रतिकार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू याप्रमाणे ३२ टन तांदूळ व २४ टन गहू उपलब्ध करून दिला आहे. दोन महिन्यांचे धान्य केंद्राने उपलब्ध करून दिले असून, मे महिन्याचे वितरण पूर्ण झाले असून, जूनचे वितरण सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने जून महिन्यातील मोफत धान्य दिलेले नसल्याने कार्डधारकांना ते आता शासनाने निश्चित केलेल्या किमतीत विकत घ्यावे लागणार आहे. तशी माहिती राजापूर पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.