शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

अद्याप मोफत धान्य मिळाले नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य ...

राजापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने, तर दुसऱ्या लाटेत मे आणि जूनचे मोफत धान्य वितरण करून सर्वसामान्य जनतेला केंद्र शासनाने दिलासा दिला आहे. मात्र, राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून केवळ एक म्हणजे मे महिन्याचे मोफत धान्य दिले असून, जूनचे धान्य ग्राहकांना पैसे मोजून खरेदी करावे लागणार आहे.

कोरोनाचे संकट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. मात्र, या परिस्थितीत सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केंद्र सरकारने केले. प्रधानमंत्री गरीब अन्न धान्य योजनेंतर्गत कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल सहा महिने केंद्राने जनतेला मोफत धान्य पुरविले होते. त्यावेळीही राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावरच सोडले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने जनतेसाठी दोन महिने मोफत धान्य वितरणाचा निर्णय जाहीर केला. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील कार्डधारकांना हे धान्य दिले जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारनेही मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र केंद्राने मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य जनतेला दिले असून, त्याचे वितरणही सुरू आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ मे या एकाच महिन्याचे धान्य मोफत दिले असून, जून महिन्याचे धान्य दिलेले नाही. याबाबत कोणतेचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे आता सर्वसामान्य जनतेला जून महिन्याचे धान्य विकत घ्यावे लागणार आहे.

राजापूर तालुक्यात अंत्योदय योजनेंतर्गत ४ हजार ४३१ कार्डधारक असून, प्राधान्य कुटुंब लाभ योजनेंतर्गत २६ हजार ५८५ कार्डधारक व १ लाख ४३ हजार ९६ इतके लाभार्थी आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या निकषाप्रमाणे प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी प्रतिव्यक्ती तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू याप्रमाणे २९३ टन तांदूळ व १८९ टन गहू उपलब्ध करून दिला आहे, तर अंत्योदय लाभार्थींसाठी जाहीर केलेला प्रतिकार्ड २५ किलो तांदूळ व १० किलो गहू याप्रमाणे ३२ टन तांदूळ व २४ टन गहू उपलब्ध करून दिला आहे. दोन महिन्यांचे धान्य केंद्राने उपलब्ध करून दिले असून, मे महिन्याचे वितरण पूर्ण झाले असून, जूनचे वितरण सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने जून महिन्यातील मोफत धान्य दिलेले नसल्याने कार्डधारकांना ते आता शासनाने निश्चित केलेल्या किमतीत विकत घ्यावे लागणार आहे. तशी माहिती राजापूर पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.