शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:46 IST

गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.

ठळक मुद्दे गोंधळी समाजावर आली उपासमारीची वेळ, लॉकडाऊनमुळे फिरती झाली बंद अत्यावश्यक सेवेत समावेश करण्याची केली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तळेरे : गोंधळी समाजाचे हातावरचे पोट असून ते भाड्याच्या घरात राहून मिळेल तिथे आपले वास्तव्य करीत आहेत. गोंधळी समाज हा गावोगावी फिरून भांडी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो.

सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीमुळे गेले तीन महिने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असल्याने समाजाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यातूनच गेले तीन महिने फिरता व्यवसाय बंद झाल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

आपल्या स्तरावरून समाजासाठी ठोस धोरण आखून पुन्हा व्यवसाय होण्यासाठी योग्य ती मदत करावी, अशी मागणी कणकवली तालुका गोंधळी समाजाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी सिंधुदुर्गजिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करून समाजाच्यावतीने लेखी निवेदनही सादर केले आहे.

जगण्याचा पर्याय म्हणून समाजातील काही लोक गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यावशक वस्तू म्हणजेच भाजीपाला विकून आपले कुटुंब चालवीत होते. परंतु ह्या कोरोना या रोगामुळे खेड्यापाड्यांपासून गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांकडून फिरून भाजी विक्री करण्यास विरोध होत असल्याने समाजावर उपासमारीचे दिवस आले आहे.

आमच्या व्यवसायाला अत्यावश्यक सेवेमधील असणारे व्यवसाय म्हणून मान्यता द्यावी व उदारनिर्वाहाचे मार्गदर्शन करावे जेणेकरून गोंधळी समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. तरी योग्य विचार करून गोंधळी समाजाला न्याय द्यावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी स्वीकारले. याप्रसंगी गोंधळी समाज तालुका अध्यक्ष शशिकांत इंगळे, सल्लागार बसवराज सूर्यवंशी, भैरीनाथ कांबळे, राजू इंगळे, माणिकराज वाघमारे हे उपस्थित होते.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गcollectorजिल्हाधिकारी