शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

corona virus in ratnagiri- आमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 5:43 PM

गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

ठळक मुद्देआमच्या गावात कोणीही येऊ नका... जिल्ह्याच्या सीमा बंदजिल्ह्यात पाच गावे स्वत:हून झाली क्वॉरंटाईन,गावात येण्यास मनाई

रत्नागिरी : गावातील जनतेला कोरोनाचा धोका कळला असल्याने आता रत्नागिरी शहरातील मांडवी, कारवांचीवाडी - धनावडे वाडी, वरवडे आदी गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत. जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील पेढे - परशुराम आणि राजापूर तालुक्यातील पाचल गावानेही गावात बंदी घातली आहे.

कोरोना संसर्गावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून संशयितांना सेल्फ क्वॉरंटाईन किंवा होम क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. यासाठी जमावबंदी, संचारबंदी करावी लागत आहे. तरीही शहरातील लोकांना त्याचे गांभीर्य वाटत नाही. मात्र, गावांनी आपल्या सीमा इतरांसाठी बंद केल्या आहेत.सध्या देशात कोरोनाने भयावह रूप धारण केले आहे. मुंबई - पुण्यासह आता रत्नागिरीतही कोरोनाचा रूग्ण सापडला असून, त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील अनेक लोक परदेशात राहतात. कोरोनाच्या भीतीने हे लोक मोठ्या प्रमाणावर देशात परतू लागले आहेत, तर काही आधीच आले आहेत.

परदेशातून आलेल्या लोकांकडूनच मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देशात परतलेल्या व्यक्तीची मोठ्या प्रमाणावर तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. देशात संसर्ग वाढू नये, यासाठी आलेल्या लोकांनाही खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जात आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही कडक पावले उचलली आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाने जिल्ह्यात जमावबंदी, जनता कर्फ्यू, लॉक डाऊन आणि अखेर संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही शहरातील नागरिक कोरोनाचा धोका तितकासा गांभीर्याने घेत नसल्यानेच पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे.

संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य आणि पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. मात्र, नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.सुशिक्षित म्हणवणाऱ्या शहरी भागात ही स्थिती असली तरी ग्रामीण जनता मात्र, वेळीच सावध झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आता या गावांना आपले विलगीकरण आपणच करण्याची गरज वाटत आहे.

त्यामुळे रत्नागिरीतील मांडवी तसेच तालुक्यातील पोमेंडी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या कारवांची वाडी - धनावडेवाडी आणि वरवडे या गावांनी ह्यसेल्फ क्वॉरंटाईनह्ण पाळत आपल्या गावामध्ये येणाऱ्यांना आणि बाहेर जाणाऱ्यांनाही बंदी केली आहे.या गावांनी बांबू किंवा दगड टाकून आपल्या गावची सीमा बंद केली आहे. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांच्या परवानगीशिवाय वाडीत प्रवेश करू नये, अशा सूचनांचे फलकही लावले आहेत. आपल्या गावात किंवा वाडीत कुणालाच येऊ द्यायचे नाही, याबरोबरच आपल्या गावातीलही कुणाला बाहेर जाऊ द्यायचे नाही, अशी ठाम भूमिका या गावांनी घेतली आहे.

या गावांनी आता कोरोनाचा संसर्ग होऊ न देण्यासाठी स्वत:च खबरदारीची उपाययोजना करीत आपल्या गावातील प्रत्येकाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी