शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांची उपलब्धता, दरातील चढ-उतार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावठी फळभाज्याही विक्रीसाठी येऊ लागल्या असून श्रावणामुळे भाज्यांना वाढती मागणी आहे. मात्र, दरात चढ-उतार कायम असून ग्राहकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

श्रावणामुळे बहुतांश लोक शाकाहार अवलंब असल्याने भाज्यांना वाढती मागणी आहे. पालेभाज्यांसह दुधी, दोडके, पडवळ, भोपळा आदी फळभाज्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फळांमध्ये सध्या सीताफळ मोठ्या प्रमाणात येत आहेत. उपवासामुळे फळांना वाढती मागणी आहे.

भेंडी, कारली, घेवडा, फरसबी, सिमला मिरची, कोबी, फ्लाॅवर, मटार बाजारात विक्रीसाठी येत असून बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. अळूची पाने, याशिवाय रानभाज्यांची उपलब्धता होत आहे. अळूच्या पानासह हळदीच्या पानाचीही मागणी होत आहे. मेथी, माठ, मुळा, पालक, शेपू या पालेभाज्यांची जुडी १० ते १५ रुपये दराने विकण्यात येत आहे. याशिवाय काकडी, चिबूडही बाजारात विक्रीसाठी येऊ लागले आहेत.

कांदे, बटाटे दर स्थिर

श्रावणात बहुतांश लोक कांदा वर्ज्य करतात. कांद्याची मागणी काहीअंशी घटली असली तरी बटाट्याला मात्र वाढती मागणी आहे. कांदा २५ ते ३०, तर बटाटा २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. कांदा-बटाट्याचे दर मात्र सध्या तरी स्थिर आहेत. श्रावणानंतर दरामध्ये पुन्हा फरक पडण्याची शक्यता आहे.

सीताफळांचा हंगाम सुरू असून बाजारात सीताफळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ८० ते १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शिवाय ओला खजूर, पपई, नासपती, अंजीर, केळी, पेरू, मोसंबी, संत्री उपलब्ध असून मागणीही वाढती आहे.

उपवासामुळे ओल्या भुईमुगाच्या शेंगा, मक्याची कणसे, रताळी यांना वाढती मागणी आहे. शेंगा ७० ते ८० रुपये किलो तर रताळी ४० ते ५० रुपये किलो तर मका दहा रुपयांना एक नग दराने विक्री सुरू आहे.

वास्तविक बारमाही भाज्यांना वाढती मागणी आहे. जिल्ह्यात बहुतांश भाजीपाला विक्रीसाठी अन्य जिल्ह्यातून येत असला तरी दरावर मात्र निर्बंध नसल्यामुळे सर्वसामान्यांची फरपट होत आहे. भाजीपाला असो वा डाळी, कडधान्य सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. एकाच शहरात भिन्न दर आकारण्यात येत असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

- अस्मिता पागधे, गृहिणी

परजिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक झाल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लिलाव झालेनंतरच विक्रीसाठी शहरात व आसपासच्या गावात वितरित होते. प्रत्यक्ष लिलावाचे दर व विक्रीच्या दरात कमालीची तफावत आढळत असून दरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने तरी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरून ग्राहकांची फरपट थांबेल.

- मंजिरी सांगले, गृहिणी