शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३४ हजार पेट्या हापूस मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:29 AM

Mango Ratnagiri : रत्नागिरी हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.

गतवर्षी कोरोनामुळे वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील विक्री व्यवस्था बंद होती. त्यामुळे पाडवा असला तरी ग्राहकांनी खासगी विक्री केली होती. यावर्षी मात्र कोरोना संकट असतानाही वाशी व अन्य ठिकाणच्या बाजारपेठेत आंबा विक्री सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी आंबा तोड करून पाडव्यानिमित्त विक्रीसाठी आंबा पाठविला आहे.

कोकणातून ३४ हजार १९ पेट्या विक्रीसाठी मार्केटमध्ये आल्या होत्या, तसेच अन्य राज्यांतून २५ हजार ९५३ क्रेटशिवाय अन्य ८० टन सुटा आंबा विक्रीसाठी उपलब्ध होता. हापूसची आवक कमी असल्याने दर बऱ्यापैकी टिकून आहेत. दोन हजार ते साडेचार हजार रुपये दराने आंबापेटी विक्री सुरू आहे.

दोन सत्रांत विक्री

कोरोना संकटामुळे वाशी मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी गर्दी होऊ नये, कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन सत्रांत खरेदी- विक्रीचा निर्णय घेतला आहे. सकाळी नऊ वाजता विक्री होणार असल्याने सकाळी ७ पर्यंत आंबा घेऊन वाहने वाशीमध्ये पोहोचतील, याचे नियोजन करावे. उशिरा दाखल होणाऱ्या वाहनातील आंब्याची विक्री दुपारनंतर होणार आहे.

दरवर्षी गुढीपाडव्यासाठी ६० ते ७० हजार पेट्या वाशी मार्केटमध्ये विक्रीला येतात. मात्र, यावर्षी एकूणच आंबा कमी असल्याने आवक निम्म्यावर आली आहे. आवक घटल्यामुळे दर सध्या टिकले आहेत. दोन सत्रांत विक्री होणार असल्याने बागायतदारांनी नियोजन करून आंबा मार्केटमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.

- संजय पानसरे,संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी (नवी मुंबई)

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी