शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे १५ कोटी थकीत

By admin | Updated: June 30, 2016 23:11 IST

कोकण परिमंडल : महावितरणच्या १ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश

रत्नागिरी : महावितरणच्या कोकण परिमंडलातील १ लाख १२ हजार ५११ ग्राहकांकडे १५ कोटी ५० लाख ३८ हजारांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजार रुपयांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची थकबाकी आहे.वर्षानुवर्षे वीजबिल न भरल्यामुळे वीजपुरवठा कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या कोकण परिमंडलातील २८ हजार ५५३ ग्राहकांकडे ९ कोटी ६ लाखांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने पावले उचलली आहेत. कायमस्वरूपी बंद तरीही घरातील अन्य सदस्यांच्या नावे मीटर घेण्यात आलेल्या ग्राहकांना शोधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.कोकण परिमंडलातील ८४ हजार ७० घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ८४ लाख ७४ हजार, वाणिज्यिक १२ हजार ७३० ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख ८३ हजार, औद्योगिक २ हजार १२७ ग्राहकांकडे १ कोटी ४९ लाख १४ हजार, कृषिपंपाच्या ९ हजार १०४ ग्राहकांकडे ६८ लाख ९० हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाधारक १४८७ ग्राहकांकडे १ कोटी १२ लाख ४१ हजार, १६०० पथदिव्यांची २ कोटी १३ लाख ३० हजार आणि अन्य १३९३ ग्राहकांकडे २६ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विभागातील १६ हजार ८५६ ग्राहकांकडे २ कोटी १५ लाख ७२ हजार, खेड विभागातील १८ हजार २१० ग्राहकांकडे २ कोटी ६३ लाख २२ हजार, रत्नागिरी विभागातील ३० हजार २६२ ग्राहकांकडे ३ कोटी ४३ लाख १३ हजारांची थकबाकी असून, जिल्हाभरातील एकूण ६५ हजार ३२८ ग्राहकांकडे ८ कोटी २२ लाख ७ हजारांची थकबाकी आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विभागातील २५ हजार २५३ ग्राहकांकडे ३ कोटी ७७ लाख ५० हजार, कणकवली विभागातील २१ हजार ९३० ग्राहकांकडे ३ कोटी ५० लाख ८१ हजारांची थकबाकी असून, एकूण ४७ हजार १८३ ग्राहकांकडे ७ कोटी २८ लाख ३१ हजारांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)वसुलीची कार्यवाही : घरगुती वीज ग्राहकांची संख्या अधिकमहावितरण कंपनीने थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले आहे. वसुलीसाठी पथक नियुक्त करण्यात आले असून, ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे. थकबाकीची रक्कम भरून होणारी कारवाई टाळावी. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.- कांचन आजनाळकर, मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.