शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खारलॅण्डच्या पाण्यामुळे ११५ माड पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : तालुक्यातील वरवडे येथील बंधाऱ्याच्या अर्धवट झालेल्या कामामुळे भरतीचे पाणी रहिवासी भागात शिरल्याने ग्रामस्थांचे नुकसान झाले. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर खारलॅण्ड विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. गुरुवारी सकाळी अधिकाऱ्यांनी माजी सरपंच निखिल बोरकर यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचयादी घातली. यामध्ये ११५ पेक्षा अधिक माडाची झाडे तसेच केळी आणि आंबा कलमांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यावेळी बंधाऱ्यावरील उघडण्यात आलेली मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे सांगितले.

तालुक्यातील वरवडे येथील खारलॅण्ड बंधाऱ्याचे काम अर्धवट अवस्थेत ठेवून काम घेतलेला ठेकेदार गायब झाला. अर्धवट अवस्थेतील कामामुळे भरतीचे पाणी थेट रहिवासी भागात शिरले. मंगळवारी पहाटे भरतीचे पाणी ग्रामस्थांच्या घरापर्यंत पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांच्या वैयक्तिक मालमत्तेचे यामुळे नुकसान झाले. यामध्ये संतोष सत्यवान पाटील यांचे ३० माड, शंकर बोरकर यांचे २५, महानंदा बोरकर यांचे ४० माड, संदीप बोरकर यांचे २० माड आणि मयूर राणे यांची केळीची झाडे पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले. रहिवासी भागात पाणी भरल्याने रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने संबंधित ठेकेदार आणि खारलॅण्ड विभागाने तातडीने हे काम हाती न घेतल्यास प्रसंगी आंदोलन छेडू, असा इशारा येथील माजी सरपंच निखिल बोरकर यांनी दिला होता.

या पार्श्वभूमीवर खारलॅण्डच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट दिली. बंधाऱ्याची मोरी तत्काळ बंद करण्यात येईल, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई मिळवून देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.