शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
2
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
3
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
4
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
5
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
6
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
7
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
8
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
9
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
10
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
11
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
12
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
13
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
14
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
15
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन
16
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
17
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
18
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
19
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
20
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा

जिल्ह्यातील तब्बल १०९९२ रिक्षाचालकांना शासनाची ‘राेटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:33 AM

अरुण आडिवरेकर लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात ...

अरुण आडिवरेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा वाढता धाेका लक्षात घेऊन राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यवसायही बंद राहणार असल्याने त्यांच्यासाठी शासनाने मदतीचा हात दिला आहे. शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १०,९९२ परवानाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

गतवर्षी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला हाेता. अनेकजण केवळ रिक्षा व्यवसायावरच अवलंबून असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडलेला हाेता. रिक्षा व्यावसायिकांचे झालेले नुकसान पाहता सध्या सुरू असलेल्या संचारबंदीच्या काळात रिक्षा व्यावसायिकांचे नुकसान हाेऊ नये यासाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे त्यांच्या ‘राेटी’चा प्रश्न मिटणार आहे.

लाॅकडाऊनमुळे रिक्षाचालकांवर उपासमार करण्याची वेळ आली आहे. रिक्षा व्यवसायच बंद ठेवल्याने करायचे काय? शासन मदत म्हणून दीड हजार रुपये देणार आहे. त्यामध्ये घर तरी चालेल का? मग इतर खर्च तर बाजूलाच राहिले आहेत. ही मदत तुटपुंजीच आहे.

- प्रभाकर खडपे, राजापूर

शासनाने मदत देऊ केली आहे. ही मदत कधी मिळेल तेव्हा मिळेल; पण ही मदत म्हणजे व्यावसायिकांची चेष्टाच आहे. आजच्या महागाईत ही मदत परवडणारी आहे का? भाजी, सिलिंडर, इंधन यांचे दर वाढतच आहेत. त्यामध्ये ही मदत किती पुरेशी पडणार आहे. त्यापेक्षा व्यवसाय सुरू करण्यास द्यावा.

- प्रमाेद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने दिलेली मदत ही अपुरी आहे. व्यवसाय पूर्णपणे बंद असून, केवळ दाेन सीटचीच परवानगी दिली आहे. ते न परवडणारे आहे. दर वाढविला तर प्रवाशांच्या राेषाला सामाेरे जावे लागते. शासन दीड हजार रुपये मदत देणार आहे; पण रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ताच तीन हजार रुपयांपर्यंत आहे. मग ही मदत पुरेल का? कर्जाचा हप्ता आणि घरखर्च यांचा ताळमेळ घालणे मुश्कील झाले आहे.

- मिलिंद चव्हाण, अध्यक्ष

रिक्षा चालक-मालक संघटना कडवई - तुरळ -चिखली

थेट खात्यात पैसे

शासनाने जाहीर केलेल्या मदतीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यातर्फे परवानाधारक रिक्षाचालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी शासनाकडे सादर केली जाणार असून, त्यानंतर रिक्षाचालकांच्या थेट खात्यात मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

मदत अपुरी

अनेकांचा केवळ रिक्षा हाच व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. कर्जाचे हप्ते, विमा यासह कुटुंबीयांसाठी हाेणारा खर्च खूप आहे. त्यामानाने मिळणारी ही मदत खूपच अपुरी असल्याचा सूर रिक्षाचालकांमधून उमटू लागला आहे. ही मदत वाढविणे गरजेचे आहे.