शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 6:44 AM

पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. परंतु निधी मिळत नसल्याने या योजना रखडल्या आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या या योजना पूर्ण करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्यात गिरवले, खैरवाडी, अकुळवाडी, गुळसुंदे, कोळखे, सोमटणे, पोसरी, नितळस, कर्नाळा, शिरढोण, नेवाळी, देवळोली, चिंध्रण या १३ गावांमध्ये लाखो रु पये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. यातील नेवाळी, देवळोली, चिंध्रण, खैरवाडी, अकुळवाडी, सोमटणे, पोसरी येथील योजनांचे काम अर्धवट असून देखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर गिरवले, गुळसुंदे, कोळखे, नितळस, कर्नाळा, शिरढोण येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.या १३ गावातील प्रत्येक योजनेला ४ ते५ वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नळ पाणी योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. १३ गावातील योजनेसाठी अंदाजपत्रकीय ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रु पये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख ६४ हजार रु पये खर्च करण्यात आले आहेत. तर या योजना पूर्ण करण्यासाठी अद्यापही ५ कोटी ६८ लाख ५४ हजार रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे.पनवेल तालुक्याचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण होवू लागले आहे. तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे नैना प्रकल्पाचा घटक झाली आहेत. भविष्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक पनवेल तालुक्यात होणार आहे. निवासी व औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाणी हीच सर्वात गंभीर समस्या आहे. भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुक्त पनवेल तालुका करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. रखडलेल्या योजना वेगाने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.गावनिहाय पाणीपुरवठा योजनेचा तपशीलनिधीअभावी पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला की कामे पूर्ववत सुरू करून पूर्ण केली जातील.- आर. डी. चव्हाण,उपअभियंता पाणीपुरवठा विभागच्१३ जलकुंभासाठी ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख रुपये खर्च झाले असून कामे पूर्ण करण्यासाठी५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

टॅग्स :Waterपाणीnewsबातम्या