शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

श्रावणात वाढला आदिवासींचा रोजगार; भाज्यांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 6:12 AM

मोहोपाडा, वावेघर, चौक बाजारपेठांमध्ये भाजी विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याने स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

मोहोपाडा : मोहोपाडा, वावेघर, चौक बाजारपेठांमध्ये भाजी विक्री चांगल्या प्रकारे होत असल्याने स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यामुळे मांसाहार करणारे देखील या महिन्यात भाजीच खाणे पसंत करतात. त्यातच चौक व रसायनी परिसरालगतचे शेतकरी व आदिवासी बांधव भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. यात शिराळे, घोसाळी, काकडी, भेंडी, पडवळ, पाल्याची भाजी व आता रानात किंवा शेताच्या बांधावर मिळणारे कवला, भारंगी, कुर्डू यांची विक्री चांगल्या प्रकारे होत आहे. ही भाजी घेण्यासाठी स्थानिकांबरोबर शहरी भागातील लोक गाड्या उभ्या करून भाजी खरेदी करताना सर्व ठिकाणी दिसत आहेत. तसेच या परिसरातील गावतलावांमध्ये शिंगाडा या फळाची शेती केली जाते, ही फळे घेण्यासाठी गुजराती व मारवाडी ग्राहक जास्त असल्याचे शिंगाडा विक्रेता सांगतात. शिंगाडा हा उपवासासाठी खातात,त्याचे विविध प्रकारची डिश बनवली जाते. ८० ते १०० रुपये किलोने विक्री होते, तर भाज्या ६० ते ९० रुपये व रानातील भाजी १० रुपये जुडीने विकली जाते. या व्यवसायाने अनेक स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Raigadरायगड