शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

महाडमध्ये एसटीनेदेखील घेतली विश्रांती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:00 AM

 प्रवासी संख्या घटली; आगाराच्या लांब पल्ल्यांच्या, ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द

सिकंदर अनवारेलोकमत न्यूज नेटवर्क दासगाव : देशभरात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालल्याने गेले अनेक दिवस नागरिकांना निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे शहरात आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटल्याने महाड आगारातील अनेक फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने गाव तिथे धाव घेणाऱ्या एसटीने महाड आगारात विश्रांती घेतली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. याचे लोण आता ग्रामीण भागातदेखील पोहोचले गेले. यामुळे शासनाने सुरुवातीला मिनी लॉकडाऊन करत दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी जाहीर केली. मात्र, खासगी प्रवासी वाहने सुरूच असल्याने शहरातील गर्दी काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने यावर मार्ग काढण्यासाठी कडक निर्बंध लावण्याचे आदेश दिले. पुन्हा नवी नियमावली जाहीर केली आहे.

या नवीन नियमावलीनुसार सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येण्यास तयार नाहीत. शिवाय, शहरातील नागरिकांनीदेखील मोठ्या शहरात आणि इतर ठिकाणी जाण्याकडे पाठ फिरवल्याने एसटी प्रवासीसंख्या घटू लागली आहे. लांब पल्ल्यांच्या, ग्रामीण फेऱ्यांना ही घटलेली प्रवासीसंख्या परवडणारी नसल्याने महाड आगाराने अनेक फेऱ्या रद्द केल्या.

दिवसाला ५०० ते ६०० किमीचाच प्रवास एसटीचा दिवसाला किमान ५०० ते ६०० किमीचाच प्रवास होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिकांसाठी एसटी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. घटलेल्या प्रवासीसंख्येमुळे गतवर्षाप्रमाणे यावर्षीदेखील अनेक बसेस महाड आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत. दिवसभर घरघर करत फिरणाऱ्या एसटीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विश्रांती घेतली आहे.

रद्द केलेल्या फेऱ्यामहाड एसटी आगाराने महाडमधून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी महाड-बोरिवली, महाड-पनवेल, महाड-ठाणे, तर ग्रामीण भागातील महाड-पोलादपूर, महाड-सापे, महाड-बागलवाडी, महाड-छ. निजामपूर, पोलादपूर-तुटवली या बसेसच्या एकूण ६२ फेऱ्या यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या ७ ते १८ एप्रिलपर्यंत रद्द केल्या होत्या. सध्या महाड-पनवेल, महाड-पुणे आणि मोजक्याच ग्रामीण फेऱ्या सुरू आहेत.

मोजक्याच फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. एखाद्या फेरीकरिता लागणारे प्रवासी उपलब्ध असल्यास बस सोडण्यात येत आहे.– शिवाजी जाधव, प्रभारी आगारप्रमुख

टॅग्स :state transportएसटी