शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:28 PM

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचा पाहणी दौरा

पेण : तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारला जाग आली असून, बाधितांचे पुनर्वसन ज्या जागेवर होणार आहे, त्या वाशिवली, वरसई, गागोदे खुर्द या गावठाणातील जागांची पाहणी, घरांची झालेली मोजणी व मूल्यांकन नोंदी व बाळगंगा मध्यम धरण प्रकल्पाच्या ठिकाणी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन बाधितांच्या पुनर्वसनाची कामे लवकरच करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पेण वरसई व जावळी निफाड खोºयातील बाळगंगा नदी तटावरील ९ महसुली गावे १३ वाड्यावरील ३३४० कुटुंबे बाळगंगा मध्यम प्रकल्पामुळे बाधित झाली आहेत. या विस्थापितांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी अनेकदा पाहणी दौरे झाले आहेत. नऊ वर्षांत जमिनीला योग्य मोबदला व प्रकल्पगस्तांचे पुनर्वसन यासाठी रस्त्यावर व कायदेशीर मार्गाने आंदोलने झाली आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांवर खटलेही दाखल झाले. मात्र, बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी माघार घेतली नाही. अखेर बुधवारी रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सिडकोचे अधिकारी, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पुनर्वसन अधिकारी-कर्मचाºयांसह बाळगंगा धरण प्रकल्पच्या ठिकाणी पाहणी केली. त्याबरोबरच वाशिवली, वरसई, व गागोदे खुर्द गावातील गावठाणातील जागांची पाहणी केली आहे.

पाहणी दौºयाप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी शितोळे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ, कार्यकारी अभियंता राजभोरा मॅडम, सिडकोचे अधिकारी काळे, पेण तहसीलदार डॉ. सुवर्णा जाधव, प्रांत कार्यालयाचे नायब तहसीलदार, यांच्यासह बाळगंगा संघर्ष समिती अध्यक्ष अविनाश पाटील, गागोदे सरपंच शिवाजी पाटील, भरत कदम, बी. बी. पाटील, जयंत नारकर, वरसई सरपंच जयश्री भेसरे आदी उपस्थित होते. बाळगंगा प्रकल्पगस्तांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी स्वत: लक्ष केंद्रित करीत आहेत. त्यामुळे नवीन वर्षात बाळगंगा मध्यम प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच बाधितांचे नव्या जागेत स्थलांतर व पुनर्वसन होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड