शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध, आमदारांनी घेतली राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 00:11 IST

Bhimashankar Eco Sensitive Zone : ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील जमिनीवर असलेल्या जंगलभागाचा मिळून भीमाशंकर अभयारण्य निर्माण झाले होते. १९८८ मध्ये केंद्रीय वन मंत्रालयाने त्या भागाला अभयारण्याचा दर्जा दिला होता.

कर्जत - तीन जिल्ह्यांत पसरलेल्या भीमाशंकर अभयारण्य आणि आजूबाजूचा १० किलोमीटरचा परिसर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला आहे. अभयारण्यालगत १० किलोमीटरचा भूभाग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, त्या भागातील विकास प्रक्रिया खोळंबून राहणार आहे. जमिनीवर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले जाणार असल्याने आणि रोजगार हिरावणार असल्याने भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध होत आहे. कर्जत तालुक्यातील स्थानिक यांच्यावर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन होत असलेल्या अन्याय थांबवावा, अशी मागणी केली.ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील जमिनीवर असलेल्या जंगलभागाचा मिळून भीमाशंकर अभयारण्य निर्माण झाले होते. १९८८ मध्ये केंद्रीय वन मंत्रालयाने त्या भागाला अभयारण्याचा दर्जा दिला होता. त्यानंतर, आता तोच भीमाशंकर अभयारण्याच्या भागाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून ऑगस्ट, २०२० मध्ये अंतरिम मंजुरी दिली आहे. मात्र, भीमाशंकर अभयारण्य इको झोन निर्माण करताना, अभयारण्य लगतच्या १० किलोमीटरचा परिसर इको झोनमध्ये समाविष्ट केला आहे. भीमाशंकर अभयारण्य हा परिसर आधीच संरक्षित वन म्हणून जाहीर केला आहे. आता त्यात इको झोनचे निर्बंध येणार असल्याने भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व भागांवर निर्बंध येणार आहेत.  इको झोनचे निर्बंध रायगडकरांना यापूर्वीपासून माहिती आहेत. त्यामुळे कर्जत, मुरबाड, आंबेगाव, जुन्नर, खेड या पाच तालुक्यांतील ३७ गावांतील लोकांचे गणपती गोड गेले नाहीत. कारण ऑगस्ट, २०२०मध्ये जाहीर झालेला भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये तब्बल १३०.७८ चौरस किलोमीटर क्षेत्राला हा झोन लावण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांतील हे क्षेत्र आता निर्बंधाखाली आले असून, लागलेले निर्बंध लक्षात घेता विरोधही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.रहिवासी घाबरलेइको झोन जाहीर झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाने विकास आराखडा मंजूर केला जाईल. तो विकास आराखडा पुढील दोन वर्षांत तयार व्हावा, असे आदेश सरकारचे असतात. मात्र, माथेरान इको झोनचा अनुभव लक्षात घेता, विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) दोन वर्षांत तयार होणार नाही. कारण माथेरान इको झोनचा मास्टर प्लॅन तयार व्हायला तब्बल १९ वर्षे लागली आहेत. त्यात माथेरान इको झोनपेक्षा भीमाशंकर अभयारण्य इको झोनचे क्षेत्र पाचपटीने जास्त आहे. या सर्व बाबींचा विचार करता, भीमाशंकर अभयारण्य इको झोनचा मास्टर प्लॅन तयार व्हायला मोठा कालावधी जाणार असून, या काळात भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ३७ गावांमधील विकास कामे ठप्प राहणार आहेत. सरकारकडून इको झोन परिसरात खोदकाम, दगड खाणी यांना निर्बंध आणण्यात आले असून, विकास कामांपासून रोजगाराची साधने त्या भागाला लावलेल्या निर्बंधामुळे बंद होणार आहेत. यामुळे कर्जत तालुक्यातील खांडस, नांदगाव, कशेळे या ग्रामपंचायतीमधील रहिवासी घाबरले आहेत

राज्य सरकार दिलासा देण्याची भूमिका घेईल - आदित्य ठाकरेकेंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्य इको झोन जाहीर केला असल्याने, या पार्श्वभूमीवर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे म्हणणे ऐकून घेत, कर्जत तालुक्यातील ज्या गावांचा समावेश भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये करण्यात आला आहे, त्या गावातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे आश्वासन दिले. आपण हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठेवू आणि मंत्रिमंडळात चर्चा करून कर्जत आणि मुरबाड, तसेच खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील जनतेला राज्य सरकार दिलासा देण्याची भूमिका घेईल, असे सांगितले.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरforestजंगलRaigadरायगड