शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भीमाशंकर इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध, आमदारांनी घेतली राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 00:11 IST

Bhimashankar Eco Sensitive Zone : ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील जमिनीवर असलेल्या जंगलभागाचा मिळून भीमाशंकर अभयारण्य निर्माण झाले होते. १९८८ मध्ये केंद्रीय वन मंत्रालयाने त्या भागाला अभयारण्याचा दर्जा दिला होता.

कर्जत - तीन जिल्ह्यांत पसरलेल्या भीमाशंकर अभयारण्य आणि आजूबाजूचा १० किलोमीटरचा परिसर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जाहीर केला आहे. अभयारण्यालगत १० किलोमीटरचा भूभाग इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला असून, त्या भागातील विकास प्रक्रिया खोळंबून राहणार आहे. जमिनीवर कोणत्याही गोष्टी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले जाणार असल्याने आणि रोजगार हिरावणार असल्याने भीमाशंकर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोनला विरोध होत आहे. कर्जत तालुक्यातील स्थानिक यांच्यावर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन होत असलेल्या अन्याय थांबवावा, अशी मागणी केली.ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील जमिनीवर असलेल्या जंगलभागाचा मिळून भीमाशंकर अभयारण्य निर्माण झाले होते. १९८८ मध्ये केंद्रीय वन मंत्रालयाने त्या भागाला अभयारण्याचा दर्जा दिला होता. त्यानंतर, आता तोच भीमाशंकर अभयारण्याच्या भागाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून ऑगस्ट, २०२० मध्ये अंतरिम मंजुरी दिली आहे. मात्र, भीमाशंकर अभयारण्य इको झोन निर्माण करताना, अभयारण्य लगतच्या १० किलोमीटरचा परिसर इको झोनमध्ये समाविष्ट केला आहे. भीमाशंकर अभयारण्य हा परिसर आधीच संरक्षित वन म्हणून जाहीर केला आहे. आता त्यात इको झोनचे निर्बंध येणार असल्याने भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये समाविष्ट झालेल्या सर्व भागांवर निर्बंध येणार आहेत.  इको झोनचे निर्बंध रायगडकरांना यापूर्वीपासून माहिती आहेत. त्यामुळे कर्जत, मुरबाड, आंबेगाव, जुन्नर, खेड या पाच तालुक्यांतील ३७ गावांतील लोकांचे गणपती गोड गेले नाहीत. कारण ऑगस्ट, २०२०मध्ये जाहीर झालेला भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये तब्बल १३०.७८ चौरस किलोमीटर क्षेत्राला हा झोन लावण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांतील हे क्षेत्र आता निर्बंधाखाली आले असून, लागलेले निर्बंध लक्षात घेता विरोधही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.रहिवासी घाबरलेइको झोन जाहीर झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशाने विकास आराखडा मंजूर केला जाईल. तो विकास आराखडा पुढील दोन वर्षांत तयार व्हावा, असे आदेश सरकारचे असतात. मात्र, माथेरान इको झोनचा अनुभव लक्षात घेता, विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) दोन वर्षांत तयार होणार नाही. कारण माथेरान इको झोनचा मास्टर प्लॅन तयार व्हायला तब्बल १९ वर्षे लागली आहेत. त्यात माथेरान इको झोनपेक्षा भीमाशंकर अभयारण्य इको झोनचे क्षेत्र पाचपटीने जास्त आहे. या सर्व बाबींचा विचार करता, भीमाशंकर अभयारण्य इको झोनचा मास्टर प्लॅन तयार व्हायला मोठा कालावधी जाणार असून, या काळात भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ३७ गावांमधील विकास कामे ठप्प राहणार आहेत. सरकारकडून इको झोन परिसरात खोदकाम, दगड खाणी यांना निर्बंध आणण्यात आले असून, विकास कामांपासून रोजगाराची साधने त्या भागाला लावलेल्या निर्बंधामुळे बंद होणार आहेत. यामुळे कर्जत तालुक्यातील खांडस, नांदगाव, कशेळे या ग्रामपंचायतीमधील रहिवासी घाबरले आहेत

राज्य सरकार दिलासा देण्याची भूमिका घेईल - आदित्य ठाकरेकेंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्य इको झोन जाहीर केला असल्याने, या पार्श्वभूमीवर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांचे म्हणणे ऐकून घेत, कर्जत तालुक्यातील ज्या गावांचा समावेश भीमाशंकर अभयारण्य इको झोनमध्ये करण्यात आला आहे, त्या गावातील जनतेला दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असे आश्वासन दिले. आपण हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठेवू आणि मंत्रिमंडळात चर्चा करून कर्जत आणि मुरबाड, तसेच खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील जनतेला राज्य सरकार दिलासा देण्याची भूमिका घेईल, असे सांगितले.

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरforestजंगलRaigadरायगड