शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 00:37 IST

व्यापाऱ्यांची भूमिका, रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते.

अलिबाग : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्रिसूत्रीच्या नियमांचे पालन करावे. तरच जिल्ह्यात कोरोना लाट रोखण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन न करता नियम व अटी कडक करून त्याची अंमलबजावणी प्रत्येक नागरिकाने करणे गरजेचे आहे, असा सूर व्यापारीवर्गाकडून उमटत आहे.

रायगड जिल्ह्यात नवरात्रीपासून कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ५६ हजार ९८० बाधित आढळले होते. यापैकी ५४ हजार २०७ कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार ६०३ जणांचा आठ महिन्यांत मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत ९७० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळता जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येऊ लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने आणि थंडीचा हंगाम सुरू झाल्याने विषाणू हवेत जास्त वेळ जिवंत राहतात. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असले तरी प्रशासन कोरोनाची लाट रोखण्यासाठी सज्ज आहे. 

रायगड, अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन तयार करणारा जनरेशन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. यासाठी जागेची पाहणी केंद्राकडून केली जाणार आहे. लवकरच जनरेशन प्लांटही कार्यान्वित केला जाणार आहे. - डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक 

कोरोनावर लस येईपर्यत नागरिकांनी सुरक्षेसाठी शासनाने आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे या नियमांचे पालन नागरिकांनी करावे. - निधी चौधरी, जिल्हाधिकारी 

माणगाव, कर्जत, पेण, श्रीवर्धन या ठिकाणी २ टनचा प्लांट तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथे २०० टन ऑक्सिजनचा साठाही करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तेवढे ऑक्सिजन उपलब्ध असून १०० व्हेंटिलेटर बेडची सुविधा केलेली आहे. औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात ठेवण्यात आला आहे. - आरोग्य विभाग

लाॅकडाऊन कालावधीत किराणा खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या  रांगा लागल्या होत्या. मात्र संचार व टाळेबंदीमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने नागरिकांना किराणा खरेदी करणेही अशक्य झाले होते. त्यामुळे सध्या आमचाही व्यवसाय पूर्ववत झाला नाही. - व्यापारी संघटना

काही कारखान्यांमध्ये काॅस्ट कटिंग झाल्याने कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. आता लाॅकडाऊन न करता कोरोनाबाबत खबरदारी घेऊन कामकाज सुरू राहणे गरजेचे  आहे. - कामगार संघटना

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस