शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात कोविड योद्धा निघाला भामटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 00:35 IST

स्वातंत्र्य दिनी केला होता गौरव । कोविड योद्धा पुरस्कार काढून घेण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रायगड : जिल्हा प्रशासनाने १५ आॅगस्टला कोविड योद्धा पुरस्कारांची खैरात वाटली. यातील गंभीर बाब म्हणजे, ज्यांना कोविड योद्धा म्हणून पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवले, त्याच्यावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे कोविड योद्धा पुरस्काराची प्रतिमा मलीन झाल्याचे चित्र आहे.


चुकीच्या पद्धतीने दिलेला पुरस्कार संबंधित व्यक्तीकडून तत्काळ काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. चक्रीवादळानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, मदतीच्या नावाखाली डॉ.साजिद सैय्यद नावाच्या एका भामट्याने जिल्हा प्रशासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत असलेली जवळीक दाखवून अलिबागेतील व्यापऱ्यांना तब्बल १८ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने तक्रार दाखल केलेली नसली, तरीही सरकारी अधिकाºयांनीच ओळख करून दिल्यानंतर राजकारणी लोकांमध्येही या भामट्याने जाळे पसरवून त्यांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच भामट्याला जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र दिनी कोविड योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते.


हा भामटा आॅल इंडिया रिहॅबिलिटेशन फोरम या संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगत होता. ती संस्था नोंदणीकृत आहे किंवा कसे, ही साधी गोष्ट तपासण्याची गरज पालकमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना कोणालाही भासली नाही, हे विशेष. या भामट्याला देशाच्या स्वातंत्र दिनी पालकमंत्री गौरवितात. भामट्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी हजेरी लावतात. कसली ही सरकारी आणि प्रशासकीय व्यवस्था? सरकारकडून एखाद्याला गौरवताना त्याची साधी चौकशी पोलिसांमार्फत का करता येत नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी विचारला आहे.


कोविड योद्धा पुरस्कार गौरवताना पुरस्कारार्थींच्या नावाची शिफारस कोणी केली, त्यासाठी कोणती समिती गठीत केली होती का, कोणते निकष लावले, याची माहिती मिळणे गरजेचे आहे. साजिदसारख्या भामट्याला गौरवण्यात आल्याने कोविड योद्धा पुरस्कारांची प्रतिमा मलिन झाली आहे, असे अ‍ॅड. राकेश पाटील यांनी सांगितले.


यापुढे विविध कार्यक्रमांमध्ये पुरस्कार वितरण करताना पालकमंत्र्यांनीही खातरजमा करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्याहस्ते गौरव म्हणेज राज्य सरकारच्या हस्ते गौरव असा अर्थ होतो, असेही अ‍ॅड.पाटील यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, एका भामट्याला जिल्हा प्रशासनाने पालकमंत्री यांच्या हस्ते गौरवल्याने पुरस्काराचे महत्त्व कमी झाले आहे. ज्यांनी खरोखरच चांगले काम केले, त्यांना याच पुरस्कारने गौरवल्याने त्यांनाही या पुरस्काराबाबत अभिमान वाटेल असे दिसत नाही, शिवाय जिल्हा प्रशासनाच्या कामाची पद्धत कशी मनमानी आहे, हेच यातून अधोरेखित होत असल्याचे बोलले जाते.

कोविड योद्धा पुरस्कार कोणाला देणार, यासाठी माझी मान्यता घेण्यात आली नव्हती. रात्री उशिरा पुरस्कारार्थींची थेट यादी मला मिळाली होती. याबाबतीमध्ये प्रशासनाने कोणते निकष लावले, समिती गठीत केली होती का, याची माहिती नव्हती. चुकीच्या पद्धतीने दिलेला काविड योद्धा पुरस्कार तत्काळ काढून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देत आहे, तसेच यापुढे खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आल्या आहेत.
- आदिती तटकरे (पालकमंत्री रायगड)

चांगले काम करणारी स्वयंसेवी संस्था असल्याबाबत आम्हाला इंटरनेटवर त्यांची माहिती मिळाली होती. सुरुवातीला विश्वास संपादन करायचा आणि नंतर फसवणूक करायची, अशी त्यांची पद्धत आहे. त्याबाबत संशय आल्याने अधिक तपास केला असता, तो फसवणूक करणारा असल्याचे आढळले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- निधी चौधरी (जिल्हाधिकारी, रायगड)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस