शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

महाड तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे अर्धवट, शेतकऱ्यांवर येणार उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:46 AM

Raigad News : परतीच्या पावसाने महाड तालुक्याला एक आठवडा झोडपून काढले होते. या लागणाऱ्या पावसामुळे जवळपास ८० टक्के शेती झोपून गेली. जी उर्वरित शेती होती, तीही दोन दिवस लागणाऱ्या पावसाने अडचणीत अली.

दासगाव - परतीच्या पावसाने संपूर्ण महाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. सध्या शेतकरी सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवरअवलंबून असून, सरकारने तातडीची मदत जाहीर करावी, पंचनामे लवकर पूर्ण करावेत, नाहीतर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे, असा आक्रोश महाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.परतीच्या पावसाने महाड तालुक्याला एक आठवडा झोडपून काढले होते. या लागणाऱ्या पावसामुळे जवळपास ८० टक्के शेती झोपून गेली. जी उर्वरित शेती होती, तीही दोन दिवस लागणाऱ्या पावसाने अडचणीत अली. अशा वेळी मात्र, १०० टक्के भात शेती बाद झाली आहे. या शेतीचे पंचनामे आजही सुरू आहेत. सरकारने पॅकेज जरी जाहीर केले असले, तरी गुंठा किंवा हेक्टरी किती मदत मिळणार ही निच्छित केलेले नाही. आज शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला असून, सरकारच्या मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून आहे. भातपीक नष्ट झाले, गुरांचा चारा संपला, अशा वेळी शासनाकडून जी मदत मिळणार आहे, ती जेवढे नुकसान झाले आहे, त्याचप्रमाणे मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.सध्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जायचेच बंद केले आहे, तर अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मिळणाऱ्या मदतीवर विश्वासही राहिलेला नाही. अनेक वेळा पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. मात्र, त्या नुकसानीच्या मोबदल्यात १० टक्केही मदत शासनाकडून मिळालेली नव्हती. त्यामुळे आता तरी शासनाने झालेल्या नुकसानीची पुरेपूर भरपाई द्यावी, नाहीतर महाड तालुक्यातील शेतकाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल. लवकर पंचनामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. 

शेतामध्ये साचले पाणीबहुतेक शेतकऱ्यांची शेती पाण्यात आहे. मात्र, शासनाकडून पुरेपूर मदतीची अपेक्षा शेतकरी वर्गाला नसल्याने, अनेक शेतकरी पाण्यातून भातकापणी करत, सपाटीवर भात सुकविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्याच्या या मेहनतीला थोडे-फार यश आले, तरी गुरांचा चारा हा संपूर्ण नष्ट झाला आहे. सध्या महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली वर्षाची बुडालेली मेहनत बघून त्याला अश्रू अनावर होत आहेत. त्यामुळे प्रत्येक शेतकरी सरकारी मदतीच्या अपेक्षेवर बसला आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRaigadरायगड