दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:13 PM2023-07-21T12:13:59+5:302023-07-21T12:14:39+5:30

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे.

During monsoon half of Irshalwadi village would have migrated to Namrachiwadi or village which was empty. | दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

googlenewsNext

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला. 

दरड कोसळताच पळत सुटलेले, धडपड करून आपला व इतरांचा जीव वाचवलेले आणि मदतकार्यादरम्यान बाहेर काढलेले १०३ जण या भीषण दुर्घटनेत वाचले. पण, अजून १००हून अधिक नागरिक ढिगाऱ्यात असल्याची भीती आहे. एनडीआरएफसह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील मदत व बचाव पथकांनी धाव घेत अनेकांना वाचवले. कोसळणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात प्रचंड अडथळे आले. अखेर काल संध्याकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. त्यानंतर आज सकाळी ६.३० वाजता पु्न्हा बचावकार्य सुरु करण्यात आले.

एका स्थानिक तरुणाने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. पावसाच्याआधी इर्शाळवाडी गाव खाली असलेल्या नम्राचीवाडी या गावात स्थलांतरित झाले होते. मात्र तिथे वनविभागाने त्यांच्यावर कारवाई केली. ती घरे तोडण्यात आली. एकदा नव्हे, तर दोनदा-तीनदा वन विभागाचे आदिवाशींनी बांदलेल्या झोपड्या तोडल्या. त्यामुळे हे गावकरी पुन्हा इर्शाळवाडीमध्ये राहण्यासाठी आले आणि ही घटना घडली. पावसाळा संपेपर्यंत वन जमिनीवर या रहिवाश्यांना राहू दिले अशते, तर आज अनेकांचे प्राण वाचले असते, असे बोलले जात आहे. 

दुर्घटना झाल्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले होते. डोंगर भागावर हे गाव असल्याने कोणतेही यंत्रसामुग्री पोहचणे अवघड आहे. त्यामुळे पावडे, घमेल आणि इतर हाती सामग्रीने शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. पावसाचा जोर असतानाही पथक हे आपले काम बजावत आहेत. शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजल्यापासून पथक यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे आज शोध मोहिमेत कोणाचे मृतदेह भेटतात का किंवा कोणी दैव कृपेने जिवंत आहे का याचा शोध पथकातर्फे सुरू आहे.

पायथ्याशी नियंत्रण कक्ष-

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. पाऊस ही पडत असल्याने काही प्रमाणात शोध मोहिमेत अडचणी येत आहे. घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानिवलीपर्यंत वाहने जाऊ शकतात. तेथे रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. खासगी डॉक्टरांचीही मदत टीएचओने बोलावली आहे. एनडीआरएफचे पथक, स्निफर डॉक स्क्वॉडही घटनास्थळी पोहोचून कार्य करीत आहे. डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

जिल्ह्याला आज रेड अलर्ट

रायगड जिल्ह्याला शुक्रवार पुन्हा हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळ पासून पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. रेड अलर्ट असल्याने सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: During monsoon half of Irshalwadi village would have migrated to Namrachiwadi or village which was empty.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.