शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

पावसामुळे फुटला कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील तलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:41 PM

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीमधील उमरोली गावातील गाव तलाव सततच्या पावसाने फुटला आहे. मे महिन्यात त्या तलावातील गाळ आणि माती सरपंच सुनीता बुंधाटे यांच्या पुढाकाराने काढण्यात आला होता. दरम्यान, गाव तलाव फुटल्याने त्यातील सर्व पाणी हे वाहून गेले आहे. त्यामुळे उमरोली गावातील जनावरांचे यावर्षी पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात असलेल्या उमरोली गावात जुना गाव तलाव आहे. त्या तलावात गेली अनेक वर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता. तो गाळ काढण्याचे काम यावर्षी उन्हाळ्यात उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनीताबुंधाटे यांनी ग्रामनिधीमधून काढून घेतला होता. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पावसाचे पाणी साचून राहणार होते. त्यामुळे उमरोली ग्रामस्थ यावर्षी आनंदात होते. मात्र गेली काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून तलाव ओसंडून वाहत होता.१४ सप्टेंबर रोजी पहाटे त्या तलावाला भगदाड पडले आणि त्यातील सर्व पाणी हे तीन तासात वाहून गेले. त्यामुळे आता तलाव कोरडा पडला असून त्या तलावाकडे पाहून उमरोली ग्रामस्थ यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.उमरोली गावातील जनावरे आणि गुरे यांच्यासाठी ते पाणी उपयोगात यायचे. मात्र आता तलाव फुटून त्यातील सर्व पाणी वाहून गेल्याने उन्हाळ्यात जनावरे काय करतील? असा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू आहे तोपर्यंत जनावरांसाठी पाण्याची अडचण भासणार नाही, मात्र उन्हाळ्यात कु ठण पाणी आणायची अशी चिंता ग्रामस्थांना सतावत आहे.