शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
Delhi Blast : "आम्ही गेट उघडला आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
4
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
5
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
8
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
9
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
10
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
11
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
12
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
13
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
14
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
15
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
16
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
17
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
18
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
19
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
20
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

वादळी पावसामुळे महाड, पोलादपूरमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:59 IST

तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कामथे विभागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कामथे, पितळवाडी, कापडे, देवळे येथे जोरदार पावसाच्या सरी पडल्या.

पोलादपूर : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कामथे विभागात विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह कामथे, पितळवाडी, कापडे, देवळे येथे जोरदार पावसाच्या सरी पडल्या. हापूस आंबा, चिकूसह फणस, रानमेवा या पिकावर पावसाचा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गावांसह शहरी भागात सायंकाळी ७ वाजता पावसाला सुरुवात झाली. मात्र पावसाळ्यापूर्वीच्या साफसफाईला सुरुवात न केल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्यासह पाणी साचले.पावसामुळे हवेतील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाल्याने गेले अनेक दिवस उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र गुरांची पेंड, सरपणाची फाटी आदी कामांची आवराआवर करताना शेतकºयांची भंबेरी उडाली. यातच परिसरातील वीज गायब झाली होती. कशेडी घाट परिसरात पावसाने ढगांच्या गडगडाटासह विजेच्या सुरात वाºयासह पावसाने झोडपून काढले. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली असून हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अवेळी आलेल्या पावसामुळे झाडे विद्युत तारांवर कोसळल्याने कोंढवी विभागाचा विद्युत पुरवठा रात्रभर बंद होता. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाºया साफसफाईला सुरुवात न झाल्याने या पावसाळ्यात रस्त्यालगतच्या गटारातून कचºयासह पाणी रस्त्यावर साचल्याचे चित्र दिसून आले. या वर्षी प्री कप वॉटर स्पर्धासह गाळमुक्त तलावासह धरण साफसफाई करण्यात येत आहे. यामुळे या वर्षी पावसाचे पाणी समतल चर सह बंधाºयामुळे पाणी साठवणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे.>ेउधाणाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक दोन तास ठप्पअलिबाग : तालुक्यातील खारेपाटातील शिरवली-माणकुळे या चार गावांना जोडणाºया महत्त्वाच्या रस्त्यावर गुरुवारी दुपारी २ वाजता उधाणाच्या भरतीचे खारे पाणी येवून ते दुपारी चार वाजेपर्यंत वेगाने वाहत राहिले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दळणवळणाकरिता या रस्त्यावर अवलंबून असणाºया बहिरीचापाडा, माणकुळे, नारंगीचा टेप आणि बंगलाबंदर या चार गावांतील ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते महेंद्र म्हात्रे यांनी दिली. शिरवली ते माणकुळे या रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत आणि रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे, परंतु ते अत्यंत संथगतीने सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दिरंगाईमुळे चारही गावांतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.उन्हाळी सागरी उधाणास हा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जातो तर पावसाळी दिवसांतील सागरी उधाणाच्या वेळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. चार गावांतील ग्रामस्थ आणि विशेष: माणकुळे हायस्कूलमध्ये येणाºया विद्यार्थ्यांकरिता ही परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती ठरु शकते. परिणामी पावसाळ््यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने वेगाने पावसाळ््यापूर्वी रस्त्याच्या बाजूने संरक्षक भिंत आणि रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांची आहे.>मोहोपाड्यात वीज वितरणकडून मान्सूनपूर्व कामे सुरूमोहोपाडा : मोहोपाडा येथील वीज वितरणच्या हद्दीतील गावांत पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाºया झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत.त्यामुळे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र, दांड-रसायनी रस्ता, कामगार वसाहतीतील गावे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वीजवाहिन्यांवरील फांद्या तोडण्याचे काम सुरू असून, लवकरच इतर परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यात येणार असल्याचे सहा. अभियंता किशोरकुमार पाटील यांनी सांगितले.मोहोपाडा वीज वितरणकडून या वेळी आठ ट्रान्सफॉर्मरचे रॉड बदलण्यात आले आहेत. तसेच ट्रान्सफॉर्मर आॅइल गळतीवर उपाययोजना, एलटी कंडक्टर बदलणे, परिसरातील लोखंडी सडलेले पोल दीनदयाळ योजनेतून बदलण्याची कामे वीज वितरणकडून परिसरात जोमाने सुरू आहेत.>वादळी पावसामुळेमहाडमध्ये नुकसानमहाड : शहरात गुरुवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळी पावसाचा महाड तालुक्यात खाडीपट्टा विभागाला मोठा फटका बसला. वादळात वलंग आदिवासी वाडीतील अनेक घरांची छपरे उडून गेली तर काही घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. यामुळे आदिवासी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जुई येथील रस्त्याच्या लगतचे अनेक विद्युत खांब खाली कोसळल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी सायंकाळी विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरवात झाली. झालेल्या नुकसानीची महसूल विभागाकडून पाहणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. वादळात घरांचे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वलंग ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजन कुर्डुनकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.