शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
3
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
4
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
5
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
6
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
7
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
8
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
9
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
10
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
11
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
12
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
13
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
15
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
16
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
17
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला

अवकाळी पावसाने बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 12:37 AM

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत

लाेकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : एप्रिल, मे महिना चालू झाला की शेतकरी आपली शेतीची कामे उरकती घेत असतो. यावेळी लागणारा लाकूडफाटा, वैरण, आदी शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जमा करण्यात शेतकरी मजूर मश्गुल असतानाच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. या अगोदर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अचानक झालेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. परसुळे येथील रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जमीनदोस्त होऊन पत्रे व इतर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. 

मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्याने जि. प. शाळा परसुले शाळेचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.  २५० पत्रे व लोखंडी कैचीसह पाईप व भिंती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच किचन शेड, शौचालय, पिण्याच्या पाण्याची टाकी, ध्वजस्तंभ व हँडवॉश स्टँड याचेही पूर्ण नुकसान झाले आहे. यानंतर सर्व ग्रामस्थ व मुख्याध्यापक कळंबे तसेच ग्रामसेवक करमत यांनी तातडीने येऊन पत्रे उडालेल्या खोलीमधून सर्व साहित्य इतरत्र हलविले. त्याचप्रमाणे गावातील जितेंद्र जाधव यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत.अचानक आलेल्या मुसळधार पावसाने तसेच वादळी वाऱ्याने नुकत्याच आलेला आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात आंबा जमिनीवर कोसळला. शेतकरी वर्ग दुहेरी संकटात सापडला आहे.

गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नपोलादपूर तालुक्यातील ढवळे भागात सोमवारी तसेच मंगळवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने दमदार पर्जन्यवृष्टी केली आहे. कशेडीसह इतर विभागात वाऱ्याचा तडाखा बसल्याने आंबे गळून पडले आहेत. त्यातच जनावरांचा चारा भिजल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील ढवली, कामथी, सावित्री विभाग, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्याच्या आंबा बागायतीला पावसाचा फटका बसला आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड