शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पालीत अंबा नदीवरील बंधाऱ्याची दुरवस्था; पाणीटंचाईचे संकट ओढावण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 05:09 IST

हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती.

- विनोद भोईरपाली : संपूर्ण पाली शहराला व पाली ग्रामपंचायत हद्दीतील गावांना येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा होतो. येथून जवळच असलेल्या बलाप गावाजवळ अंबा नदीचे पाणी अडविण्यासाठी के.टी. बंधारा आहे. तेथे अंबा नदीचे पाणी अडवून साठविले जाते. या के.टी. बंधाºयामुळेच पालीवासीयांना पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सद्यस्थितीत हा बंधारा पूर्णपणे मोडकळीस आला असून, लवकर दुरुस्ती न केल्यास पालीकरांवर पाणीटंचाईचे संकट ओढावेल.हा बंधारा अनेक ठिकाणी तुटलेला होता. याची कोलाड पाटबंधारे विभागाकडून मागील वर्षी डागडुजी करण्यात आली होती. या डागडुजी करण्यास बराच खर्चही आला होता. त्या वेळी हा के.टी. बंधारा काही प्रमाणात पूर्वस्थितीत आला होता. मात्र, दुरुस्ती करून एक वर्ष होत नाही, तोच पुन्हा हा बंधारा मोडकळीस येऊन त्याची दुरवस्था झाली आहे.अनेक ठिकाणी स्लॅब तुटला आहे. त्यातून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. बंधाºयाला आधार देणारे दगडी खांब मोडकळीस आले आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात कचराही साठला आहे. अशाच परिस्थितीत हा बंधारा राहिल्यास पाणीगळती होऊन पाली शहरावर पाण्याचे संकट येऊ शकते. यामुळे या बंधाºयाची लवकर दुरस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.प्रवास करणे धोकादायकआजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांचे या बंधाºयावर येणे-जाणे सुरू असते. हा बंधारा रहदारीसही वापरला जातो. तुटलेला असल्याने येथून ये-जा करणे धोकादायक आहे.त्यामुळे एखादा अपघातही होऊ शकतो. त्यामुळेच अतिशय उपयोगी असलेल्या या बंधाºयाकडे पाटबंधारे विभागाने व पाली ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.अन्यथा, पालीवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.बलाप येथील के.टी. बंधारा नादुरुस्त झाला आहे. तो तातडीने दुरुस्त व्हावा, म्हणून आम्ही कोलाड पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे.- गणेश बाळके,सरपंच, पालीवारंवार तक्रार करूनही या बंधाºयाकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. या बंधाºयावरून लोक पायी ये-जा करतात; त्यामुळे दुर्घटना होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकर या बंधाºयाची दुरुस्ती करण्यात यावी.- किशोर खरिवले, उपसरपंच, बलापआगामी चार ते पाच दिवसांमध्ये के.टी. बंधाºयाची डागडुजी करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.- राजेंद्र मोहरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पाटबंधारे विभाग, कोलाड

टॅग्स :Raigadरायगड