शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हारे गावाची नळपाणी योजना बंद

By admin | Updated: October 10, 2015 23:36 IST

कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे कोल्हारे गावाची नळपाणी योजना गेल्या आठवड्यापासून बंद आहे. महावितरण कंपनीकडून वीज वाहून नेणारे नादुरुस्त खांब बदलले जात नाहीत. त्यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा होऊन पंप जळून जाण्याचे प्रमाण वाढले आहेत. महावितरण कंपनीविरुद्ध प्रचंड नाराजी कोल्हारे ग्रामस्थ यांच्यामध्ये पसरली असून, पाणीपुरवठा सामितीने जाहीर फलक लावून निषेध व्यक्त केला आहे. भारत निर्माणच्या पेयजल कार्यक्रमातून कोल्हारे येथील नळपाणी योजना तयार करण्यात आली होती. गतवर्षी या नळपाणी योजनेचे उद्घाटन झाले होते. या योजनेचे पाणी कोल्हारे गाव, बोपेले तसेच कातकरवाडी आणि रामकृष्णनगर या भागाला दिले जाते. उल्हास नदीवर उगम असलेल्या या नळपाणी योजनेचे पाणी विहिरीत आणून त्यावर विद्युत पंप लावण्यात आले आहेत. यासाठी कोल्हारे गावात असलेल्या रोहित्रामधून विजेचा पुरवठा केला आहे. वीज रोहित्रपासून उल्हास नदीवरील पंप हाऊस हे अंतर किमान दोन किलोमीटर आहे. यादरम्यान कोल्हारे कातकरवाडी असून, तेथे वीज पोहोचून ती पुढे पंप हाउस येथे जाते. त्या संपूर्ण मार्गात असलेले अनेक विजेचे खांब किमान २० वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक खांब जीर्णावस्थेत असून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत; तर काही खांब झुकलेल्या अवस्थेत आहेत. कोल्हारे ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा आणि स्वछता समिती यांनी कर्जत आणि नेरळ येथील महावितरण कंपनीला याबाबत लेखी तक्र ारी केल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून नादुरुस्त विजेच्या खांबाची दुरु स्ती करण्यात न आल्याने पंपहाऊसमध्ये होणारा वीजपुरवठा खंडित स्वरूपात आहे.गेल्या सहा महिन्यांत तब्बल १० वेळा वीजपंप नादुरु स्त झाले आहेत. त्यावर आतापर्यंत कोल्हारे पाणीपुरवठा समितीने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र महावितरणने कोल्हारे नळपाणी योजनेला अखंडित वीजपुरवठ्यासाठी कोणतेही प्रयत्न न केल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष राहुल गोमारे यांनी केला आहे. आठ दिवसांपासून नादुरुस्त वीजवाहिन्यांमुळे कमी दाबाने वीज पंपहाऊसपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कोल्हारे गावाचा पाणीपुरवठा बंद आहे. रहिवाशांचे प्रचंड हाल सुरू असून, महिलांना डोक्यावर हंडे घेऊन उल्हास नदीवर जावे लागत आहे. या सर्व प्रकरणास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कोल्हारे पाणीपुरवठा समितीने केला आहे. (वार्ताहर)