शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, जीवनशैली बदला अन् निरोगी व्हा

By admin | Updated: January 21, 2015 00:43 IST

ऐन तारुण्यात विविध आजारांनी टाकलेल्या विळख्याचे मूळ तरुणाईच्या आजच्या जीवनशैलीत आहे.

पुणे : ऐन तारुण्यात विविध आजारांनी टाकलेल्या विळख्याचे मूळ तरुणाईच्या आजच्या जीवनशैलीत आहे. त्यामुळे जीवनशैली बदला आणि निरोगी व्हा, असा मंत्र पुण्याच्या वैद्यकीय क्षितिजावरील नामवंत डॉक्टरांनी दिला. ‘लोकमत’ पुणे कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत ‘आजची तरुणाई, बदलती जीवनशैली आणि आरोग्य’ या विषयावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी मते व्यक्त केली. या प्रसंगी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर उपस्थित होते.यामध्ये प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वासुदेव परळीकर, मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटणकर, औषधशास्त्राचे अभ्यासक डॉ. पद्माकर पंडित, प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. कोमलकीर्ती आपटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग, आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र जगताप, जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन डॉ. सुहास नेने, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वैशाली किराणे, फिजिओथेरपीतज्ज्ञ डॉ. अर्चना रानडे व डॉ. ज्योती पुरोहित, जनरल फिजिशियन डॉ. दिलीप देवधर, जनरल फिजिशियन डॉ. विजय जगताप, बालरोगतज्ज्ञ डॉ. पार्वती हळबे, फिटनेसतज्ज्ञ मनाली मगर, आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे, ऐश्वर्या मुळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा मुधोळकर, होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. इंद्रनील बावडेकर यांनी सहभाग घेतला होता. जीवनशैली ही व्यक्तिमत्त्व आणि कामाचे स्वरूप यानुसार ठरते. जीवनशैलीची व्यक्तिमत्त्वाशी सांगड घालत आरोग्य जपायला हवे. आहार, विचार, झोप यादृष्टीने कामांचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. तणावापासून दूर राहायचे असेल तर ज्या गोष्टी केल्याने छान वाटते, त्या वाढवत न्याव्यात. म्हणजे छान न वाटणाऱ्या गोष्टी आपसूकच कमी होतील, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.सध्या अनेकांना होणारे किडणीस्टोन, वंध्यत्व, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना जीवनशैलीच कारणीभूत आहे. ती बदलायची तर शाळा आणि महाविद्यालयीन स्तरापासून विद्यार्थ्यांचे आरोग्यविषयक प्रबोधन गरजेचे आहे. सकारात्मक विचार आणि मानसिक शांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यात अध्यात्म अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते, असे डॉक्टरांनी आवर्जून सांगितले.ग्रामीण भागातील लोकांमध्ये मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, अ‍ॅनिमिया अशा आजारांचे प्रमाण खूप कमी असते. पण तुलनेने शहरात हे सर्व आजार दिसतात, असे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. वेळेचे नियोजन आणि वेळेचा योग्य वापर केल्यास कामाचा ताण न येता चांगले जीवन जगता येऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली.बाहेर खाण्याचे वाढते प्रमाण आणि सातत्याने मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही अशा स्क्रीनकडे लागलेले डोळे यांचा आरोग्यावर घातक परिणाम होतोय. वेळच्या वेळी आणि किमान सात तास झोप होणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यकच आहे, अशी अपेक्षा एकूण चर्चेतून व्यक्त झाली. (प्रतिनिधी)सामाजिक आरोग्यही जपा जीवनशैलीत सुधारणा केल्यास आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात निश्चित कमी होऊ शकतात. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहनही वैद्यकीय तज्ज्ञांनी 'लोकमत'च्या व्यासपीठावरून केले.